द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत. बगलफुटी, जास्त प्रमाणात वेलीवर निघालेल्या फुटी कमी करून कॅनॉपी मोकळी करावी. मणी थिनिंगच्या वेळी खराब झालेले मणी कमी करावेत. द्राक्ष विभागातील फळछाटणी संपली आहे. बऱ्याच ठिकाणी बागायतदार वातावरण व तसेच उपलब्ध पाणी याचा विचार करून फळछाटणी लवकर घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच बाजारात एकाच वेळी द्राक्ष येत असल्याने योग्य दर मिळणार नाही, हे लक्षात घेऊनही फळछाटणीचे नियोजन केले जाते. गेल्या दोन दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांमध्ये (लोहारा, तेलडोकी, किल्लारी, बार्शी) तसेच राज्यातील इतर द्राक्ष विभागात जोरदार पाऊस झाला आहे. या विभागातून स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष जास्त प्रमाणात विक्रीसाठी जातात. काही बागायतदार बेदाणा निर्मितीवर भर देतात. किल्लारी परिसरातील काही बागायातदार द्राक्ष निर्यातदेखील करतात. या विभागामध्ये विविध अवस्थेतील द्राक्षबाग आहेत. या भागात झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांच्या व्यवस्थापनात काही बदल करावे लागणार आहेत.
पोपटी रंगाची अवस्था असलेली द्राक्षघडांची बाग या बागेत फळछाटणी होऊन फक्त १७ ते १८ दिवस झाले आहेत. सध्याच्या काळात झालेल्या पावसामुळे वेल वाढीचा जोम जास्त प्रमाणात राहील. जोराचा पाऊस झाला असल्यास घडावर काही प्रमाणात मार बसण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत जर ढगाळी वातावरण टिकून राहिले तर कुजेची समस्या तयार होऊ शकते. या वेळी बगलफुटीचा जोम जास्त राहील. वेलीची पानांची गरज अजून पूर्ण झालेली नाही. हे लक्षात घेऊन खालील उपाययोजना कराव्यात.
फुलोरा अवस्थेतील द्राक्षबाग
उपाययोजना
३) मणी सेटिंग झालेली बाग मणी सेटिंग झालेल्या अवस्थेतील बागेमध्ये गळ व कुजेची समस्या नसेल; परंतु पावसाचा मार जास्त बसल्यास मणी चपटे होण्याची किंवा डागळण्याची समस्या दिसते. उपाययोजना
संपर्क ः ०२०-२६९५६०६० राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.