आपल्या आहारातील पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्त्वे व पाणी हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्त्वे ताज्या भाज्यांमधून मिळतात. त्यासाठी रोजच्या अाहारात हिरव्या, ताज्या पालेभाज्यांचा समावेश हवाच. शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्त्वे गरजेची आहेतच, परंतु आहारातील इतर घटकांच्या पोषणासाठीही त्यांची गरज असते. प्रथिनांच्या पचनासाठी 'अ' जीवनसत्त्व, कर्बोदकांच्या पचनासाठी 'ब' जीवनसत्त्व तर स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी 'ई' जीवनसत्त्वाची गरज असते. शिवाय हाडांच्या बळकटीसाठी 'ड' जीवनसत्त्व, रक्ताची घनता ठराविक प्रमाणात ठेवण्यासाठी 'के' जीवनसत्त्व आणि या सर्वांना सावरणार अस 'क' जीवनसत्त्व आपल्याला अहारातून मिळणे गरजेच असते. ही सारी जीनवसत्त्वांची गरज विविध पालेभाज्यांमधून भागवता येते. पालेभाज्यांमध्ये विविध खनिजे अाणि जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असतात.
पालेभाजीची उपयुक्तता वाढवणारा आणखी एक घटक म्हणजे त्यात असलेला चोथा. या चोथ्यामुळे शरीरात घाण साठून रहात नाही. आतडी कार्यक्षम रहातात. आतड्यातील आवश्यक जिवाणूंची पैदासही या चोथ्यामुळेच होते. त्यामुळे खालेल्या अन्नाच्या विविध घटकांचे अगदी शेवटपर्यंत नेऊन पचन करण शरीराला सहज शक्य होत. शिवाय आतड्यात तयार होणारे पित्तासारखे विषमय पदार्थही या चोथ्यामुळे बाहेर टाकणे शक्य होते. त्यामुळे पालेभाज्या आहारात नित्य असणे गरजेचे आहे. काही पालेभाज्यांचे अाहाराच्या दृष्टीने महत्त्व पुढीलप्रमाणे.
पालक
मेथी
कोथिंबीर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.