अडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन पीक फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांची कमतरता, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अवर्षण परिस्थिती किंवा पाण्याचा जास्त वापर आणि निचऱ्याचा अभाव यामुळे क्षारयुक्त चोपण जमिनीची वाढती समस्या या बाबींमुळे राज्यात ऊस उत्पादकता घटलेली दिसून येते. जमिनीची व पिकाची अन्नद्रव्याची गरज रासायनिक, सेंद्रिय अथवा जिवाणूजन्य खते यांच्या एकत्रित वापरातूनच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. अडसाली उसासाठी किमान तीन वर्षांतून एकदा तरी शेणखत अथवा कंपोस्टखत देण्याची शिफारस असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक कमी-जास्त होत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटले आहे. परिणामी, जमिनीमधील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या घटली आहे. अशा सर्व घटकांचा परिणाम ऊस उत्पादकतेवर झाला आहे. हे टाळण्यासाठी मातीपरीक्षण करून, सेंद्रिय, रासायनिक व जिवाणू खतांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर करण्याची आवश्यकता आहे. ऊस लागवडीचे अडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू असे प्रमुख तीन हंगाम आहेत. प्रत्येक हंगामातील ऊसवाढीचा कालावधी हा वेगळा आहे. हंगामनिहाय ऊस जातींची निवड आणि खतांचा वापर केला पाहिजे.
सेंद्रिय खत व्यवस्थापन ः
रासायनिक खतांचा वापर :
जिवाणू खते व त्याचे प्रकार जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. घनरूप व द्रवरूप स्वरूपातील जिवाणू खतांची तुलना करता द्रवरूप जिवाणू खते अनेक बाबतीत सरस असतात. द्रवरूप स्वरूपातील ॲसिटोबॅक्टर, अॅझोटोबॅक्टर, अॅझोस्पिरिलिअम, स्फुरद विरघळवणारे जिवाणू, पाचट कुजविणारे जिवाणू अशा जिवाणू खतांचा वापर करावा.
नत्र स्थिर करणारे जिवाणू वातावरणामध्ये ७८ टक्के नत्र वायूरूपात आहे. अॅसिटोबॅक्टर, अॅझोटोबॅक्टर, अॅझोस्पिरिलिअम व रायझोबिअम असे नत्र स्थिर करणारे जिवाणू हवेतील वायुरूप नत्र शोषून घेतात. त्याचे रूपांतर जमिनीमध्ये किंवा वनस्पतीमध्ये अमोनिया नत्रामध्ये करतात. नायट्रीफिकेशन क्रियेमध्ये अमोनिया नत्राचे रूपांतर नायट्रेट नत्रात होऊन ते पिकास मुळावाटे उपलब्ध होते. १ हेक्टर जमिनीत अॅझोटोबॅक्टर द्रवरूप जिवाणू खताची मात्रा २.५ लिटर इतकी द्यावी. जिवाणू खत ७५० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा १५०० किलो शेणखत/ कंपोस्ट / मातीमध्ये मिसळून ते जमिनीत सर्वत्र समप्रमाणात पसरले जाईल असे मिसळावे. अॅसिटोबॅक्टर या जिवाणू खताची ऊस लागवडीआधी १ लिटर प्रति २५० लिटर पाणी याप्रमाणे बेणेप्रक्रिया करावी किंवा लागवडीनंतर ६० दिवसांनी उसाच्या पानांवर फवारणी केल्यास शिफारशीत नत्र खत मात्रेत ५० टक्के बचत करता येते.
स्फुरद विरघळवणारे जिवाणू
संपर्क ः महेश लांडगे, ९८२२५८४४६३ (श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड. ता. संगमनेर, जि. नगर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.