मसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे लक्षात घेऊन गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. नवीन रोपे, कलमांना सावली करावी. आधार द्यावा. झाडाच्या बुंध्याजवळ आच्छादन करावे. दालचिनी
कोकण तेज व तेजपत्ता या जातींचे चांगले उत्पादन मिळते. काढणी हंगाम नोव्हेंबर ते एप्रिल असा असतो. साल काढण्यासाठी झाडे तोडल्यानंतर त्याला बुंध्यातून असंख्य फुटवे येतात. सर्वच फुटवे वाढू दिले तर गर्दी होते. त्यांची नीट वाढ होत नाही. हे टाळण्यासाठी मे -जून महिन्यामध्ये त्यांची विरळणी करावी. जोमदार चांगले वाढणारे ५ ते ७ फुटवे ठेवून बाकीचे सर्व फुटवे काढावेत. त्यामुळे अधिक व लवकर उत्पादन मिळते. कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती आणि कोकण संयुक्ता या जातींचे चांगले उत्पादन मिळते. नवीन रोपे, कलमांना सावली करावी. आधार द्यावा. कलमे, रोपे पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. त्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होणे आवश्यक असते. ठिबक सिंचनाद्वारे प्रति झाड ३० लिटर प्रति दिन पाणी द्यावे. बुंध्याजवळ आच्छादन करावे. पाण्याच्या ताणापासून मिरीवेल जपावेत. नियमित पाणी द्यावे. फळांचे घोस उंदीर, खार, सरडे खाणार नाहीत. गळ होणार नाही यांची काळजी घ्यावी. नवीन लागवडीला सावली करावी. प्रति वेलाला १० लिटर प्रति दिन इतके ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. बुशपेपर मिरीची जोपासना करताना बुंध्यामध्ये तण येणार नाही याची काळजी घ्यावी. झाडास कडक उन्हाचा त्रास होतो. रोपे लहान असताना त्यावर सरळ ऊन पडले तर पाने करपतात. खोड काळे पडून खराब होते. म्हणून रोपांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी. झाडांना पाण्याचा ताण पडणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पाण्याचा ताण पडल्यास पाने मोठया प्रमाणावर गळतात, फांद्या सुकतात. प्रति दिन २० ते २५ लिटर ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. रोपांना आधार द्यावा. नियमित पाणी द्यावे. डॉ. वैभव शिंदे, ९५१८९४३३६३ ( प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी)