सन २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे १० अब्ज होणार आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या आहाराची तजवीज करण्यासाठी गरिबी, जंगलांची हानी आणि वाढत्या हरितगृह वायूचे उत्सर्जन यामध्ये वाढ होत जाणार आहे. भविष्यात या समस्येला सामोरे जाताना आपल्या खाद्य पद्धतीमध्ये लक्षणीय बदल केल्याशिवाय पर्याय नसल्याचे संशोधकांचे मत आहे. जागतिक बॅंक, संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण आणि विकास कार्यक्रम, सीआयआरएडी आणि आयएनआरए या संस्थांनाद्वारे प्रकाशित होणाऱ्या जागतिक स्रोत अहवालाअंतर्गत ‘सस्टेनेबल फूड फ्युचर’ या अहवालामध्ये या विषयाची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. २०५० पर्यंत होणाऱ्या १० अब्ज लोकसंख्येसाठी अन्नांची मागणीही ५० टक्क्याने वाढेल. आहारामध्ये प्राणीज घटकांचा (मांस, डेअरी आणि अंडी) समावेश असल्यास मागणीचे प्रमाण सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. लक्षावधी लोकांना भूकेचा सामना करावा लागेल. शेतीखालील क्षेत्र एकूण क्षेत्राच्या निम्म्यापर्यंत पोचलेले असेल. या साऱ्या प्रक्रियातून जागतिक हरितगृह वायूच्या एक चतुर्थांश इतके उत्सर्जन होणार आहे. अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणे, हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी राखणे, शेतीखालील क्षेत्रामध्ये वाढ होऊ न देणे हे सारे साध्य करण्यासाठी सीआयआरएडी- आयएनआरए अॅग्रीमोन्डे टेरा यांनी जाहीर केलेल्या अहवालामध्ये २२ पर्याय सूचविण्यात आले आहेत.
हा अहवाल https://www.wri.org/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.