पिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादनक्षमता असलेल्या जाती, खते व पाणी या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. त्यातील पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास अधिक उत्पादन मिळवता येते. पाण्याशिवाय वनस्पती फार काळ जिवंत राहू शकत नाही. प्रत्येक पिकांची पाण्याची गरज ठरावीक असते. ती सर्वसाधारणपणे पीक, जमिनीचा प्रकार, पिकांच्या वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलत असते. या वर्षी पाऊसमान कमी राहिल्याने बहुतांश विभागातील विहिरीतील पाण्याची पातळी कमी आहे. अनेकांनी शेततळ्याचे नियोजन केलेले असले तरी पाण्याचा साठाही मर्यादित आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. त्यातून कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळवणे शक्य होऊ शकते. पिकासाठी पाण्याची नेमकी किती आवश्यकता असते त्यानुसार उपलब्ध पाण्याच्या किती पाळ्या मिळू शकतात, यानुसार रब्बी हंगामामध्ये पिकाची निवड करणे अपेक्षित असते. उदा. हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, मोहरी, गहू, सूर्यफूल
पीकवाढीनुसार पाण्याचे नियोजन
पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाणी देण्याची वेळ
पाणी देण्याच्या पद्धती
पीक | एकूण पाण्याची गरज (सेंमी/हे.) | एकूण पाळ्या | दोन पाळ्यांतील अंतर (दिवस) |
गहू | ४५-६० | ५-६ | १५-१८ |
रब्बी ज्वारी | ३५-४० | ३-४ | २०-२५ |
हरभरा | ३०-४० | ३ | २०-२५ |
मोहरी | ३०-३५ | ३-४ | २०-२५ |
करडई | ४०-४५ | २ | ३० |
सूर्यफूल | ४०-६० | ४-५ | २० |
अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ डॉ. एस. एच. पठाण, ८१४९८३५९७० (कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.