भुरी, पिंक बेरीकडे लक्ष द्या...

द्राक्ष घडाला पेरर गुंडाळल्यामुळे पींक बेरीजवर नियंत्रण मिळवणे शक्‍य आहे.
द्राक्ष घडाला पेरर गुंडाळल्यामुळे पींक बेरीजवर नियंत्रण मिळवणे शक्‍य आहे.

मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची लाट आहे. येत्या आठवड्यात सर्व द्राक्ष विभागात वातावरण निरभ्र राहणार असल्यामुळे थंडीची लाट कायम राहणार आहे. तलाव, नदी तसेच कालव्याच्या काठावरील बागांमध्ये जेथे खेळती हवा फार कमी आहे अशा ठिकाणी पहाटेचे तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिक विभागात रविवारपर्यंत बऱ्याच ठिकाणी तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीपासून बागेचे संरक्षण कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे.

  • मागील आठवड्यात दिलेल्या सल्याप्रमाणे बागेच्या जवळपासच्या भागात पहाटे शेकोटी पेटवावी. पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या वेगाच्या प्रमाणात बागेमध्ये किती पाणी द्यायचे हे ठरवावे.
  • कायटोसॅन २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून घडावर फवारावे.
  • सिलिसिक ॲसिड (उपलब्ध सिलिकॉन) फॉर्म्युलेशननुसार योग्य प्रमाणात फवारणे आवश्यक आहे.
  • भुरीचे नियंत्रण ः अति थंडीच्या वातावरणामध्ये बागेमध्ये कोणताही रोग सहजासहजी वाढणार नाही. परंतु ज्या ठिकाणी दुपारी भरपूर सूर्यप्रकाश असल्यास या वेळी तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून जास्त वाढण्याची शक्यता असते. जास्त कॅनॉपी असलेल्या बागांमध्ये हळूहळू भुरी वाढण्याची शक्यता असते. सध्याच्या काळात भुरीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसत नाही. परंतू दुर्लक्ष केल्यास जस जसे तापमान वाढत जाते तस तसा भुरीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. पिंक बेरी नियंत्रण ः बऱ्याच बागांमध्ये पिंक बेरीच्या नियंत्रणासाठी घडावर कागद लावण्याचे काम सुरू झाले आहे. घडावर कागद लावण्या अगोदर भुरीचे योग्य नियंत्रण करून पेपर लावावा. एखादी सल्फरची फवारणी (दीड ग्रॅम प्रतिलिटर पाणी) किंवा त्या पाठोपाठ जैविक नियंत्रणासाठी ॲम्पिलोमायसीस क्विसकॅलिस (८ ते १० मिलि प्रतिलिटर पाणी) किंवा ट्रायकोडर्मा (५ मिलि प्रतिलिटर पाणी) किंवा बॅसिलस सबटिलिस (२ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) याची फवारणी घेऊनच द्राक्ष घडांवर पेपर लावावा. सध्याच्या वातावरणामध्ये सल्फर व ॲम्पिलोमायसीसच्या फवारण्या आलटून पालटून ज्या बागांमध्ये झालेल्या होत्या त्या सर्व बागांमध्ये भुरीचे चांगले नियंत्रण झाले असल्याची माहिती सर्व द्राक्ष विभागातून मिळत आहे. फळ छाटणीनंतरच्या ५५ दिवसांनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकाची एकही फवारणी न करता फक्त सल्फर आणि जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीच्या योग्य वापराने भुरीचे चांगले नियंत्रण मिळविणे शक्य आहे. हे या परिणामात दिसत आहे. याची बागायतदारांनी नोंद घ्यावी. झीरो रेडिस्यू द्राक्ष निर्मितीसाठी या नियोजनाचा चांगला फायदा बागायतदारांना होणार आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com