मानसिक तणाव हेदेखील मासिक पाळी पूर्व त्रासाचे कारण मानले जाते. त्यासाठी पोटातल्या औषधांच्या जोडीला ध्यान, धारणा, प्राणायाम केलाच पाहिजे. मासिक धर्म नैसर्गिक रीतीने त्रास न होता, औषधे न घेता सुरू झाला पाहिजे. कंबरदुखीसारख्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन स्त्रियांनी आपले आरोग्य उत्तम ठेवावे आणि सक्षम बनावे. साधारणपणे पौगंडावस्थेत मुलींमध्ये जे शारीरिक बदल होतात त्यापैकी सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक बदल म्हणजे मासिक धर्म प्रारंभ होणे! प्रत्येक महिन्यात ठराविक काळात होणारा हा बदल शिस्तीतच होणे अपेक्षित असते. अगदी सुरवातीला मुलींमध्ये अनियमिता असते पण ती कायम नको! अनेकदा मासिक स्राव सुरू होण्याआधी प्रचंड अॅसिडीटी वाढणे, कंबर पोट पाठ दुखणे, पाय दुखणे अशी लक्षण फारच तीव्र स्वरुपाची दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. ओटीपोटात चमका येणे, डोके दुखणे तर एवढे तीव्र की स्त्रिया दैनंदिन कामेही नीट करू शकत नाहीत. यासाठी दोन पाळींच्या मधल्या काळात नियमित औषधे, पथ्य व्यायाम या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. थोड्या प्रमाणात वेगळी लक्षणे जी अनारोग्यास कारण ठरतात ती स्वाभाविक असतात; पण त्याचा परिणाम गंभीर असू नये.
उपचार
आहारात पथ्य ः शिळे पदार्थ, फोडणीची पोळी, चहापोळी, लोणचे, मिरची ठेचा, तेलकट पदार्थ, तिखटाचे पदार्थबंद करावेत. नियमित वेळेला जेवण घ्यावे. भूकेच्या वेळी चहा, कॉफी घेणे टाळावे.
घेण्याची काळजी ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.