साधारणपणे वय ११ ते १५ या दरम्यान मुलींमध्ये शारीरिक बदल होतात. त्यातील मासिक पाळी हा महत्त्वाचा बदल होताना योग्य पद्धतीत होतोय की नाही याकडे खरं तर फार सुरवातीपासून लक्ष देणे गरजेचे असते. दरमहा होणारा स्राव हा नैसर्गिक असल्याने तो होताना त्रास होणार नाही ही काळजी प्रत्येकीने घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी हा बदल अतिशय नैसर्गिक असतो. त्यामुळे त्याचा त्या विशिष्ट दिवसांत खूप त्रास होणे अपेक्षित नसते. जर का तो होत असेल तर दुर्लक्ष करणे योग्य नाही. बऱ्याचदा पाळीच्या त्रासाकडे होणारच असे गृहीत धरून फारसे लक्ष दिले जात नाही. सुरवातीला स्त्राव जास्त प्रमाणात असतो, तसेच पाळी सुरू झाल्यावर नियमित असेलच असे नाही. पण कालांतराने या सर्व गोष्टीत नियमितता यायलाच हवी. त्यासाठी स्त्रियांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन योग्य ती चिकित्सा, तपासण्या केल्या पाहिजेत. अतिस्राव दोन प्रकारांत होतो. एकतर वेळेच्या खूप आधी मासिक स्राव होतो आणि खूप ब्लीडिंग होते. दुसरे वेळेवर स्राव सुरू होतो आणि अधिक काळापर्यंत होतो. इतका की हालचाल करणे, काम करणे खूप कठीण होते. बऱ्याचदा गाठी पडतात. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही; कारण त्याचे दुष्परिणाम म्हणून थकवा, रक्त कमी होणे ही लक्षणे दिसून येतात.
उपाययोजना
आहाराचे पथ्य
अतिस्राव असणाऱ्या महिलांनी हे पथ्य पाळणे फार आवश्यक असते. अळीव, वरई, मेथी, आंबट दही, ठेचा, पापड, लोणचे, तळलेली मिरची, तिखट मसाले या सर्व गोष्टी टाळाव्यात. भुकेच्या वेळी चहा, कॉफी घेणे टाळावे. चहाचे प्रमाण कमी असावे.
औषधांच्या बाबतीत काळजी मासिक स्राव जास्त होतो तेव्हा औषधांनी फरक पडतो पण नंतरही पुढची तारीख येईपर्यंत ठराविक औषधे पोटात घेणे आवश्यक असते. उष्णता पहिल्यापासून असेल तर ती कमी करण्यासाठी नियमितपणे औषधे घेणे आवश्यक ठरते. या सर्व गोष्टी तत्ज्ञांना विचारून ठरवाव्यात.
शारीरिक व्यायाम
(लेखिका पुणे येथे अायुर्वेदतज्ञ अाहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.