शेततळ्याची जागा निवडताना पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर निवडू नये, कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळी प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावीत. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल या प्रमाणे वळवावे.
पावसाच्या पाण्याचे योग्य रितीने व्यवस्थापन केल्यास जिरायती शेतीमधील अडचणीवर थोड्या फार प्रमाणात मात करता येते. राज्यातील बऱ्याचशा जिरायती जमिनी या काळ्या मातीच्या आहेत. या मातीवर पडणारे पावसाचे पाणी हे जास्त प्रमाणात वाहून जाते. साधारणतः हे प्रमाण पडणाऱ्या पावसाच्या ३० टक्क्यांपर्यंत असते. असे हे पाणी अडवून, साठवून आणि नंतर गरजेच्या वेळी उपयोगात आणण्यासाठी शेततळे फायदेशीर ठरते. शेततळे नाला ओघळीचे काठावरील पडक्षेत्रात घेतले जाते. शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी दिल्यास हमखास पीक येते. जेथे सहजासहजी विहीर खोदणे शक्य होत नाही. तेथे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी शेततळे तयार करून पाणी साठवावे.
शेततळ्यासाठी जागेची निवड
शेततळ्याची जागा निवडीचे तांत्रिक निकष
- डॉ. मदन पेंडके : ९८९०४३३८०३ ( अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.