केंद्र शासन अर्थसाह्य नीलक्रांती धोरणांतर्गत ‘मत्स्यव्यवसायाचे एकात्मिक विकास व व्यवस्थापन’ या योजनेत २१ विविध योजना राबविल्या जातात. या धोरणांतर्गत मत्स्य व्यावसायिक, मत्स्य शेती करणारे, मत्स्योद्योजक यांच्या सहयोगाने राज्यातील भू-जलाशयीन, सागरी व निमखारे पाणी क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करून मत्स्योत्पादनात वाढ करण्याचा मुख्य उद्देश आहे. मत्स्योत्पादनवाढीच्या योजना राबविताना शाश्वत पद्धतीने, जैविक सुरक्षितता व पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
अशी आहे योजना भूजलाशयीन मत्स्योत्पादन वाढीला मोठा वाव आहे. भूजलाशयीन मत्स्योत्पादनाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी नीलक्रांतीअंतर्गत भूजलाशयीन क्षेत्रासाठीच्या आठ योजनांतर्गत ‘ मत्स्यसंवर्धनासाठी नवीन तळी तयार करणे’ या एका योजनेचा समावेश आहे.
योजनेचे उद्दिष्ट
योजनेचे निकष, अटी व शर्ती
अर्थसाह्याचे स्वरूप केंद्र शासनाचा ५० टक्के व लाभार्थ्याचा ५० टक्के हिस्सा. नवीन तळी बांधकामासह त्यामध्ये पाण्याची पातळीचे नियंत्रण करणारी यंत्रणा, पाणी पुरवठ्याच्या सोयी व एरिएशन यंत्रणा, खाद्य ठेवण्याचे गोदाम आदींसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयांच्या मर्यादेत केंद्र शासनाचे ५० टक्के म्हणजेच ३ लाख ५० हजार रुपये अनुदान.
संपर्क कार्यालयाचे नाव आणि पत्ता
- सचिन गाढवे, ९४०३३५६९५६ (सहायक संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई )
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.