जळगाव जिल्ह्यातील बारा तालुके हगणदारीमुक्त

जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या शौचालयांच्या निर्मितीचे काम गतीने झाले. मध्यंतरी काही गावांमध्ये ठेकेदारांच्या मनमानी व वाळूसंबंधीच्या अडचणीच्या तक्रारी आल्या. यावर लक्ष देऊन प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. काही ठिकाणी प्रभारी गटविकास अधिकारी असल्यानेही अडचणी आल्या आहेत. - नंदकिशोर महाजन, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, जळगाव
जळगाव जिल्ह्यातील बारा तालुके हगणदारीमुक्त
जळगाव जिल्ह्यातील बारा तालुके हगणदारीमुक्त

  राज्यात हगणदारीमुक्तीसंबंधी मार्च २०१८ ची मुदत शासनाने दिलेली असताना जिल्ह्यातील १५ पैकी फक्त १२ तालुके हगणदारीमुक्त झाले आहेत. मोठ्या तालुक्‍यांमध्ये यासंदर्भात कार्यवाहीला अडचणी येत असून, संबंधित तालुक्‍यांमध्ये प्रशासकीय दृष्ट्या गटविकास अधिकारी व ग्रामविस्तार अधिकारी असमर्थ ठरल्याचेही समोर आले आहे. 

  सध्या पावसाळा सुरू असल्याने कामे अधिकृतपणे पूर्ण करणे शक्‍य नाही. परंतु तरीही प्रशासनाने ही कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करायच्या सूचना दिल्या आहेत. दोन लाख शौचालयांचे काम पूर्ण करायचा लक्ष्यांक मार्च २०१८ पर्यंत ठेवला होता. परंतु जवळपास २५ हजार शौचालयांचे काम होऊ शकले नाही. जामनेर, चाळीसगाव, जळगाव, अमळनेर येथे कार्यवाही संथ गतीने सुरू होती. एरंडोल, धरणगाव, चोपडा, भडगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, रावेर, धरणगाव हे तालुके हगणदारीमुक्त झाले आहेत. बोदवड, भडगाव, एरंडोल या लहान तालुक्‍यांमध्ये कामे लवकर पूर्ण करण्यावर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने भर दिला. गतीने कामे केल्याने हे तालुके वेळेत कामे पूर्ण करू शकले. परंतु इतर तालुक्‍यांमध्ये मात्र प्रभारी अधिकारी, ग्रामस्थांचा कमी प्रतिसाद आणि ग्रामसेवकांची कुचराई यामुळे कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत.  भुसावळ तालुका मागील वर्षीच हगणदारीमुक्त झाला. या तालुक्‍याचा सन्मान जिल्हा प्रशासनाने केला आहे. मध्यंतरी पाणीपुरवठा व स्वछता विभागाच्या मंत्रालयातील वरिष्ठांनी शौचालयांच्या कामांबाबत कुचराई करणाऱ्या अधिकारी व वरिष्ठांना तंबी दिली होती. तसा आढावा व्हीसीद्वारे घेतला. यानंतर जवळपास १३८ ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या. संबंधित ग्रामसेवकांची चौकशीही प्रशासनाने प्रस्तावित केली. परंतु नंतर संबंधित ग्रामसेवकांनी कामात सुधारणा केली.  चाळीसगाव, जामनेर हे तालुके मोठे आहेत. सर्वाधिक कामे याच तालुक्‍यात अपूर्ण आहेत. जामनेरात सुमारे १० हजार तर चाळीसगावातही जवळपास पाच ते सहा हजार कामे अपूर्ण आहेत. तर रावेरातही जवळपास तीन ते चार हजार कामे अपूर्ण आहेत. या महिन्यात ही कामे उरकली जाण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

वाळू व निधीची अडचण जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून मागील वर्षी हाती घेतलेल्या कामांसाठी पहिल्या टप्प्याचा साडेतीन हजार रुपये प्रतिशौचालय हा निधी वितरित झाला नाही. तर पूर्ण झालेल्या शौचालयांच्या लाभार्थींनाही १०० टक्के अनुदान मिळालेले नाही. १२ हजारपैकी नऊ हजारच अनुदान काही ग्रामसेवकांनी दिले आहे. तर अनेक ठिकाणी वाळूची अडचण मध्यंतरी निर्माण झाली. एका गावात एका ठेकेदाराला सर्व कामे दिली गेली. त्यात संबंधित ठेकेदाराने मनमानी केली. नंतर वाळूचे कारण सांगितल्याचा प्रकारही उघड झाला आहे. या प्रकाराची माहिती सदस्यांनी मध्यंतरी सर्वसाधारण सभेत दिली होती. परंतु, नंतरही प्रशासनाने ठोस पावले यासंदर्भात उचललेली नसल्याचे चित्र आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com