श्रमदानातून पाणी टंचाईवर महागोंड गावाने केली मात

महागोंड, जि.कोल्हापूर ः  ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ काढल्याने चांगला पाणी साठा झाला आहे.
महागोंड, जि.कोल्हापूर ः ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ काढल्याने चांगला पाणी साठा झाला आहे.

महागोंड (ता. आजरा) येथील आंबेओहळ नाल्यावरील बंधारा पहिल्याच पावसात भरला आहे. ग्रामस्थांनी मे महिन्यात श्रमदान करून या बंधाऱ्यातील गाळ काढला होता. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे येथे असलेल्या नागरिकांनी सोळा उपाय योजना सुचवल्या होत्या. याबाबत ग्रामसभा घेऊन श्रमदान करण्याचा निर्णय झाला. त्यांच्या सूचनेनुसार आंबेओहळ पात्रातील असलेल्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढला. यासाठी गावातील सर्वांनी सहभाग नोंदवला. याची दखल घेऊन सरकारने या गावात जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. बंधारा गाळमुक्त झाल्याने यावर्षी झालेल्या पावसाचे पाणी बंधाऱ्यात साचले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे बंधारा तुडुंब भरला. या पाण्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे.                                            .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com