हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भार

हमीभावावाढीमुळे जो वित्तीय भार पडणार होता तो २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात अन्नधान्य अनुदानाच्या स्वरुपात आधीच समायोजीत केला आहे. त्यामुळे नवीन भार सोसण्याची गरजच भासणार नाही. - पीयूष गोयल, अर्थमंत्री
हमीभाव
हमीभाव

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. वाढलेल्या हमीभावामुळे अतिरिक्त भार पडला असून हमीभाव देण्यासाठी २०० अब्ज रुपयांची तरतूद करावी लागणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  केंद्राने शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचे आश्वासन पूर्ण करताना २०१८-१९ च्या खरिपासाठी १४ पिकांमध्ये मोठी वाढ करून दीडपट हमीभाव दिल्याचे सांगितले. मात्र ही वाढ ए२+एफएल या खर्च सूत्रावर आधारित आहे. सी२ ही सर्वसमावेशक खर्च पद्धतीला बगल दिली. त्यामुळे शेतकरी, नेते अभ्यासकांनी सरकारचा हा मुद्दा खोडला. परंतु अर्थमंत्रालयाने या हमीभाववाढीमुळे तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असल्याचे सांगितले. ‘‘खरिपातील हमीभाववाढीमुळे २०१९मध्ये किमान २०० अब्ज रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे, असे अंदाज आम्ही अंतर्गत पातळीवर काढला आहे. पिकांचे हमीभाव जाहीर करताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यामुळे तिजोरीवर १५० अब्ज रुपयांचा भार पडणार असल्याचे सांगितले होते.   अर्थमंत्रालयाच्या सूत्रांच्या मते, हमीभावावाढीनंतर २०० अब्ज रुयांची होणारी वाढ ही गहू पिकाचा हमीभाव आणि खरेदीचा खर्च वगळता होणार आहे. तसेच हमीभावावाढीचा परिणाम केवळ याच वर्षात जाणवेल.  कमी उत्पादन असणाऱ्या पिकांत मोठी वाढ २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करतना अरुण जेटली यांनी, देशातील शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव सरकार देणार असल्याचे सांगितले होते. परंतु देशात सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या भात पिकात केवळ १२ ते १३ टक्के वाढ केली आहे. कापसात गुणत्तेनुसार २६ ते २८ टक्के वाढ केली आहे. तर ज्या पिकांचे कमी उत्पादन होते, अशा रागीमध्ये ५२ टक्के तर कराळ्यात ४५ टक्के आणि ज्वारीमध्ये ४२ टक्के वाढ करण्यात आली आहे.   

वित्तीय तुटीवर परिणाम नाही सरकारने म्हटले आहे, की पिकांच्या हमीभाव वाढीमुळे २०१८-१९ च्या वित्तीय तुटीवर काहीच परिणाम होणार नाही. वेगवेगळ्या संस्था आणि विश्लेषकांना वित्तीय तूट वाढणार असल्याचे सांगितले होते. परंतु वित्तीय तूट विकास दराच्या ३.३ टक्के ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. भावावाढीवर किंचित परिणाम होऊ शकतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com