साखर मूल्यांकनात २०० रुपयांनी वाढ

साखर मूल्यांकनात २०० रुपयांनी वाढ
साखर मूल्यांकनात २०० रुपयांनी वाढ

कोल्हापूर : साखरेचे दर वाढल्याचा सकारात्मक परिणाम राज्य बँकेच्या मूल्यांकनावर झाला आहे. बँकेने साखरेच्या मूल्यांकनात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ केली आहे. गुरुवारी (१४) बँकेने याबाबत कारखान्यांना पत्राद्वारे याबाबत कळवले आहे. सध्याच्या प्रचलित २७०० रुपयात २०० रुपयांनी वाढ करून हे मूल्यांकन २९०० रुपये करण्यात आले आहे. मूल्यांकन वाढीचा फायदा कारखान्यांना होणार आहे. यामुळे कारखानदारांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. नव्या मूल्यांकनानुसार कारखानदारांना २४६५ रुपये उचल मिळणार आहे. केंद्र सरकारने आठ दिवसांपूर्वी साखर उद्योगासाठी पॅकेज जाहीर केल्यानंतर देशांतर्गत साखर बाजारातील साखरेचे दर किमान क्विंटलला ५०० रुपये वाढले होते. हे दर सध्या ३००० रुपये क्विंटलपर्यंत आहेत. दर वाढले असले तरी पण राज्य बँकेने मूल्यांकन २७०० रुपये मूल्य धरूनच कर्ज पुरवठा सुरू ठेवला होता. साखर दर वाढल्याने बँकेने मूल्यांकन दरात वाढ करावी, अशी मागणी साखर उद्योगातून होत होती. या निर्णयामुळे कर्ज वाढून मिळणार असल्याने थकीत रक्कम ऊस उत्पादकांना देणे सुलभ होणार आहे.  नव्या समीकरणानुसार साखर पोत्याच्या ८५ टक्के म्हणजे २४६५ रुपये कारखान्यांना मिळतील. ७५० रुपये प्रक्रिया खर्च वजा जाता कारखान्याला पहिल्या हप्त्यासाठी १७१५ रुपये प्रति टनाला उपलब्ध होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com