महाराष्ट्रात अद्यापपर्यंत कापूसाची निम्मीच पेरणी...

कापूस लागवड
कापूस लागवड

नवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये मागील काही वर्षांपासून पिकावर बोंड अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे देशातील कापूस लागवड ३० टक्क्यांनी घटली आहे. महत्त्वाच्या कापूस उत्पादक महाराष्ट्रात तर कपाशीखालील क्षेत्रात ४९.६ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा मॉन्सूनने वेळेआधीच देश व्यापला आहे. त्यामुळे पेरण्यांनी वेग घेतला. मात्र बऱ्याच ठिकाणी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने पेरणी काहीशी खोळंबली आहे. देशात मंगळवारपर्यंत (ता.४) ३२.२ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. मगील वर्षाच्या तुलनेत ही लागवड ३०.२ टक्क्यांनी कमी आहे. देशात कर्नाटक, हरियाना, पंजाब, राजस्थान ही चार राज्ये वगळता सर्वच राज्यांमध्ये कापूस लागवड घटली आहे. मात्र या राज्यांमध्ये यंदा कापूस लागवड घटली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशातील एकूण कापूस लागवडीवर झाला आहे. सध्या देशात केवळ ३२.२ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे.   देशात कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत ६ लाख २६ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी १२ लाख ४३ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. सध्याची लागवड ही ४९.६ टक्क्यांनी कमी आहे. गुजरातमध्ये कापूस लागवड ५१.२ टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षी ४ लाख ९६ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यंदा केवळ २ लाख ४२ हेक्टरवर लागवड झाली आहे.   महाराष्ट्र, गुजरात आणि तलंगणा या राज्यांमध्ये कापूस लागवड घटली आहे. सध्या या राज्यांमधील अनेक भागांत जोरदार पावसाने अद्याप हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरणीस पोषक वातावरण नाही. त्याचा परिणाम कापूस लागवडीवर झाला आहे. २०१७-१८ च्या हंगामात त्या आधीच्या वर्षापेक्षा देशात ३४९ लाख गाठींचे (एक गाठ = १७० किलो) उत्पादन झाले होते. यंदा सुरवातीलाच लागवड घटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बोंड अळीचा फटका महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरात राज्यात बीटी कापसावर मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. गुजरातमध्ये दोन वर्षाआधी बोंड अळीने थैमान घातले होते. मात्र मागील वर्षी तेथील राज्य सरकारने बोंड अळीला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली आणि त्यामुळे बोंड अळी नियंत्रणात आली. तरीही तेथील शेतकऱ्यांनी यंदा कपाशीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यामंध्ये तर २०१७-१८ च्या हंगामात बोंड अळीने प्रचंड नुकसान केले. महाराराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच बोंड अळी आली. त्यामुळे कवडीयुक्त कापूस निघाला आणि त्याचा परिणाम दरावर झाला. शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. तेलंगणातही बोंडळीने कहर केला. तंत्रज्ञान बोंड अळी रोखू शकले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीकडे पाठ फिरविली आहे.       

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com