पीककर्ज वेळेवर न वाटण्यामागे सरकारचे षड्‍यंत्र ः धोंडगे

शंकरअण्णा धोंडगे
शंकरअण्णा धोंडगे

नांदेड : खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असताना बॅंकांनी आजवर उद्दिष्टाच्या दहा टक्केसुद्धा कर्ज वाटप केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही. या मागे सरकारचे षड्‍यंत्र असल्याची टीका राष्ट्रवादी किसान सभेचे राज्य प्रमुख तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केली. श्री. धोंडगे म्हणाले, की राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. ती एवढी फसवी ठरली आहे की आजवर 10 ते 15 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. वर्षभरात कर्जमाफी योजनेचे निकष बदलण्यात आले. त्यामुळे बॅंकांही संभ्रमात असून, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्यभरात पीक कर्जवाटप अत्यंत संथ गतीने सुरू आहे. राष्ट्रीयकृत बॅंका कर्ज देण्यास निरुत्साही असतात. त्यात सरकारने कर्जमाफीचा घोळ घातल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीमालाचे भाव निच्चांकी पातळीवर असताना तसेच आवश्यकता नसताना शेतीमालाची आयात केली जात आहे. यामुळे शेतकरी आर्थिक दिवाळखोरीत निघाला आहे. पीक विम्याचा गाजावाजा करुनही नुकसान भरपाईबद्दल 25 टक्के रक्कमदेखील पदरात पडते की नाही याबाबत शंका आहे. वेळेवर पीक कर्जपुरवठा झाला नाही तर अनेक पटीने व्याज घेणाऱ्या सावकारांकडे जाण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. राज्यातील युती सरकारची तीच इच्छा आहे. सुलभ कर्ज  वाटप योजना अवघड झाली आहे. या मागे सरकारी षड्‍यंत्राचा भाग आहे अशी टीका श्री. धोंडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com