नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आता तालुक्याऐवजी ग्रामपंचायत प्रभाग व जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतीत राबवले जाणार आहे. याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ पंचायत समिती व स्वच्छ जिल्हा परिषद स्पर्धाही राबवली जाणार आहे. जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर ग्रामपंचायतीचा गौरव होईल. बक्षिसाच्या रकमेतही मोठी वाढ केली आहे. राज्यातील संपूर्ण गावांत शौचालयाची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा करत राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा झाली आहे. असे असले तरी शौचालयाच्या व्यतिरिक्त अन्य बाबीसाठी गावांनी, ग्रामपंचायतींनी सक्रिय राहण्यासाठी ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ राबवले जात आहे. अभियानात आता काहीसे बदल केले आहे. तालुका पातळीएवजी जिल्हा परिषद गटनिहाय एका ग्रामपंचायतीला बक्षीस मिळेल. याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीमधील एका प्रभागालाही बक्षीस मिळेल. अभियानाला १ मे पासून सुरवात होईल. २ आक्टोबरला राज्य पातळीवर बक्षीस वितरण होईल. जिल्हा परिषद पंचायत समितीला बक्षिसासाठी तपासणी समिती ३० गुणांवर, प्रभागासाठी शंभर गुणांवर आणि ग्रामपंचायतीसाठी दोनशे गुणांची निकष असेल. १६ ते ३१ मे या कालावधीत ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायती सहभाग निश्चित करतील. नगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी सहभाग घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे.
बक्षिसासाठी महत्त्वाच्या बाबी
यशवंतराव चव्हाण पारितोषिक बंदच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू झाल्यानंतर अभियानात लोकांचा सहभाग वाढावा आणि अभियानाला व्यापक प्रसिद्धी मिळावी, यासाठी लेखन करणाऱ्या पत्रकारांना स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती पारितोषिक सुरू केले होते. जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर ते दिले जाई. चार वर्षांपूर्वी अभियानात बदल करताना मात्र हे पारितोषिक बंद केले. अभियानात नव्याने बदल केले मात्र पारितोषिकाचा मात्र कुठेही उल्लेख नाही. अशी आहेत बक्षिसे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.