जायकवाडी धरणातून पुन्हा पाणी सोडणार

जायकवाडी धरणातून पुन्हा पाणी सोडणार
जायकवाडी धरणातून पुन्हा पाणी सोडणार

पैठण (जि. औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरण आज (शुक्रवार) शंभर टक्के भरल्यामुळे धरणातुन पुन्हा गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची शक्यता धरण प्रशासनाच्या सुत्रांनी व्यक्त केली.

पाण्याची आवक यापेक्षा अधिक वाढल्यास हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे  सुत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता. २१) धरणाची पाणी पातळी ९८ टक्के झाल्यामुळे धरणाच्या एकुण २७ पैकी १८ दरवाजे उघडून गोदापात्रात पाणी सोडण्यात आले होते.  

धरणातून एकूण १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दोन दिवसाच्या काळात सोडण्यात आला. आता पुन्हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा ओघ वाढला असल्यामुळे पुन्हा पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, धरणात तीन हजार ६०० क्युसेक पाण्याची आवक असून, धरणाची पाणी पातळी १०० टक्के झाली असल्याची माहिती धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com