कोल्हापूर : जयंती नाला तुडूंब वाहू लागला; गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : जयंती नाला तुडूंब वाहू लागला; गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर : जयंती नाला तुडूंब वाहू लागला; गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसाची संततधार दुपारनंतर कायम राहिली. त्यामुळे कोल्हापूर शहरातील मोठ्याप्रमाणातून जाणारे पाणी थेट जयंती नाल्याला मिसळल्याने हा नाला आज दुपारी तुडूंब भरून वाहू लागला आहे.

शहरातील सांडपाणी वाहून नेणार हा मोठा नाला आहे. आता यामध्ये पावसाच्या पाण्याने शिरकाव केल्याने एखाद्या लहान बंधाऱ्याप्रमाणे हा नाला वाहत आहे. दरम्यान, राधानगरी, गगनबावडा, शाहुवाडी, करवीर तालुक्‍यात धुव्वाधार पाऊस असून हा पाऊस पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, कोल्हापूरातील धरणांमधील पाण्याचा विसर्ग वाढल्याने सर्वच नद्यांमधील पात्रांमध्ये पाणी पातळी वाढत आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व इतर स्वयंसेवी संस्थांना अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने दिल्या आहेत.

डोगाराच्या पायथ्याखाली असणाऱ्यांना गावांना सर्तकतेचा इशारा जिल्ह्यातील सुमारे पन्नास गावे डोंगर पायथ्याखाली आहेत. पावसाचा वाढता जोर पाहता. अशा सर्व गावांना ज्या-त्या तालुक्‍यातील म्हणजे पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा तालुक्‍यातील लोकांना जिल्हा प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com