तानसा परिसरातील गावांना धोका नाही: धरणाचे १६ दरवाजे उघडे

तानसा परिसरातील गावांना धोका नाही: धरणाचे १६ दरवाजे उघडे
तानसा परिसरातील गावांना धोका नाही: धरणाचे १६ दरवाजे उघडे

ठाणे : तानसा परिसरात सोमवारी रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत १९५ मिमी पाऊस झाला. यावेळी धरणाचे ३८ दरवाजे स्वयंचलित पद्धतीने उघडण्यात आले होते. मात्र, आता सध्या १६ दरवाजे उघडे असून उर्वरित बंद आहेत, असे सहायक अभियंता यांनी सांगितले आहे. दरवर्षी अशा रीतीने सर्व दरवाजे उघडे करावे लागतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

तानसा परिसरातील गावांना सोमवारपासूनच खबरदारीचा इशारा देण्यात आला होता. ठाणे आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांना तशा सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता मुंबईच्या तुलनेत पावसाचा जोर बराच कमी असल्याने काही दरवाजेही बंद करण्यात आले असून कोणत्याही गावाला धोका नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com