पुनर्वसित गावात पाणीपुरवठ्यासाठी रास्ता रोको आंदोलन

पुनर्वसित गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा  मागणीसाठी माजी मंत्री सोळंकेसह ग्रामस्थांचे आंदोलन
पुनर्वसित गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा मागणीसाठी माजी मंत्री सोळंकेसह ग्रामस्थांचे आंदोलन

माजलगाव, जि. बीड: शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायतीने पाणीपट्टी थकविल्याने कारणावरून अकरा नगर पालिकेने बंद केला आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग २२२ वर खानापुर बसस्थानकासमोर आज (ता. २० बुधवारी) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात माजी मंत्री प्रकाश सोळंकेंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. शहरालगतच असलेल्या खानापुर, शेलापुरी, रेणापुरी, ब्रम्हगांव, चिंचगव्हाण, देवखेडा, पुनंदगांव, नागझरी, नांदुर, काडीवडगांव या पुनर्वसित गावांचा नगर परिषदेने वरिल ग्रामपंचायतीने थकीत पाणीपट्टी कर न भरल्याने पाणीपुरवठा बंद केला आहे. यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी राष्ट्ीय महामार्गावर आज रास्ता रोको करण्यात आले. मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार आर. व्ही. कुलकर्णी यांना देण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री प्रकाश सोळंके, चंद्रकांत शेजुळ, विजय अलझेंडे, कल्याण आबुज, अर्जुन नाईकनवरे, दत्ता कांबळे, मधुकर कांबळे सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलन महिला घागर, व हंडे घेउन सहभागी झाल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com