सरकारचा लबाडपणा जनतेच्या लक्षात येत आहे ः धोंडगे

नांदेड मोर्चा
नांदेड मोर्चा

नांदेड  : भाजपने सत्ताप्राप्तीसाठी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या. कर्जमाफीचे स्वप्न दाखवले; पण आता हळूहळू सरकारचा लबाडपणा जनतेच्या लक्षात येत आहे. शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडलेला असताना सरकार मात्र लक्ष देत नाही, अशी कडाडून टीका किसान मंचचे निमंत्रक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी सरकारवर केली.

निवडणूक काळात दिलेली आश्वासने न पाळणाऱ्या सरकारच्या विरोधात सोमवारी (ता. ११) कंधार (जि. नांदेड) येथे काढण्यात आलेल्या रुमणे मोर्चाच्या वेळी ते बोलत होते. या वेळी किसान मंच कार्यसमिती प्रमुख किशोरभाऊ माथनकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे, तालुका अध्यक्ष बाबूराव केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. विजय धोंडगे, प्रल्हाद पाटील फाजगे, डाॅ. सुनील धोंडगे, शिवराज पवार, उत्तम कोंडलवाडे, दत्ता कारामुंगे आदी उपस्थित होते.

धोंडगे पुढे म्हणाले, की सध्या शेतकरी, शेतमजूर मोठ्या अडचणीत सापडला आहे. दुप्पट उत्पन्न तर दूरच आहे, त्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतमालाचे भाव पडले आहेत. निसर्गाचा बदललेला असमतोल, सरकारचा लहरीपणा, वाढलेली महागाई, फसवी कर्जमाफी या सर्वच कारणांमुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडलेला असताना सरकार मात्र लक्ष देत नाही, अशी टीका त्यांनी केली. या वेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com