यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे कोरडवाहू पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकरी पुन
अॅग्रो विशेष
तापमानात चढ-उतार सुरुच
पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल, किमान तापमानात एक ते दोन अंशांची घट झाली आहे. दोन दिवस उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता असल्याने तापमानात चढ-उतार शक्य आहे. आज (ता. २७) रात्रीच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात मुख्यत: निरभ्र आकाशासह दिवसाचे कमाल तापमानही कमी-अधिक होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल, किमान तापमानात एक ते दोन अंशांची घट झाली आहे. दोन दिवस उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता असल्याने तापमानात चढ-उतार शक्य आहे. आज (ता. २७) रात्रीच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात मुख्यत: निरभ्र आकाशासह दिवसाचे कमाल तापमानही कमी-अधिक होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जम्मू काश्मीर, पंजाब, हरियणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत (ता. २८) गारपिटीसह हलका पाऊस पडण्यास पोषक हवामान आहे. यातच अफगाणिस्तान आणि परिसरावर असलेल्या पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे पश्चिम राजस्थानमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. यातच अाेडिशापासून उत्तरअंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यातच गुजरात किनाऱ्यालगत अरबी समुद्राच्या ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे.
पश्चिमेकडून वाहणाऱ्या या वाऱ्यामुळे राज्याच्या तापमानात १ ते २ घट झाली आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळी हवेत गारठा होता. धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमान १२.८ अंशांपर्यंत खाली आले आहे. तर दोन दिवसांपर्वी राज्यात अनेक ठिकाणी ३७ अंशांवर गेलेले दिवसाचे तापमान ३४ ते ३६ अंशांपर्यंत कमी झाले होते. मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
मंगळवारी (ता. २६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६ (१४.०), नगर - (१३.४), जळगाव ३४.० (१६.०), कोल्हापूर ३५.४ (१८.७), मालेगाव ३९.२ (१६.८), नाशिक ३१.७ (१५.६), सांगली ३६.४ (१५.३), सातारा ३६.४ (१५.०), सोलापूर ३७.१ (१८.६), अलिबाग २८.९ (२०.०), डहाणू २९.६ (१८.०), सांताक्रूझ ३३.१ (२०.०), रत्नागिरी ३२.५ (१९.८), औरंगाबाद ३३.० (१७.०), बीड ३२.९, नांदेड ३८.५ (१६.५), उस्मानाबाद ३६.१ (१७.६), परभणी ३५.५ (१६.३), अकोला ३५.८ (१७.१), अमरावती ३५.० (१७.२), बुलडाणा ३०.६ (१६.८), चंद्रपूर ३६.० (१५.२), गोंदिया ३५.० (२०.२), नागपूर ३५.१ (१५.३), वर्धा ३१.५ (१६.३), यवतमाळ ३४.० (१७.४).
- 1 of 656
- ››