नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत अफवा पसरल्याचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला. मात्र या काळात देशी कोंबड्याना मागणी कायम राहिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिनाभरात नव्यानेही देशी कोंबडी पिलांना मोठी मागणी होत असून उत्पादकांकडे साधारण दिड ते दोन महिन्यांचे आगाऊ बुकींगही होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेमुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका सोसावा लागला. अनेक उत्पादकांना ब्रॉयलर कोंबड्या, अंडी, पिले नष्ट करावी लागली. मात्र चिकनबाबत ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चिकनला मागणी वाढली. मात्र तोपर्यत बऱ्यापैकी कोंबड्या नष्ट झाल्या होत्या. शिवाय नव्यानेही पिले संभाळण्यासाठी टाकली नव्हती. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने ब्रॉयलर चिकनच्या ठोक दरात ४० ते ५० तर किरकोळ विक्रच्या दरात ७० ते ९० रुपयांनी वाढ झाली आहे.
मात्र या कालावधीत देशी कोंबड्यांनी मागणी कायम राहिली आहे. तरीही देशी कुक्कुट उत्पादकांनीही मागील महिन्यात नव्याने पिले संगोपनासाठी टाकली नाहीत. मात्र लोकांची देशी कोंबड्यांना मागणी असल्याने देशी पिलांनाही उत्पादकांकडून मागणी वाढली आहे. राज्यातील बहूतांश भागात देशी कुक्कुटपालन केले जात असले तरी प्रामुख्याने नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, यवतमाळ, चंद्रपुर, अमरावती, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. देशी पिलांना मागणी वाढत असताना कामगार नसल्याने उत्पादनाला मात्र अडचणी येत आहेत. मागणी वाढल्याने प्रती पिलांच्या दरातही चार ते पाच रुपयांनी वाढ झाल्याचे देशा कुक्कुटपालक सांगत आहेत. सर्वसाधारण राज्यातील देशी कोंबडीपालनाची स्थिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.