पुणे बाजार समितीत शेतीमालाची आवक तुरळकच

पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे सुमारे दोन महिने बंद असलेल्या पुणे बाजार समितीमधील फळे, भाजीपाल्याचा बाजार पूर्ण क्षमतेने सुरु केल्यानंतरही आवक तुरळकच आहे. शुक्रवारी (ता.५) भाजीपाल्याची २८४ वाहनांमधून अवघी सुमारे ६ हजार क्विंटल आवक झाली होती. शेतकरी आणि खरेदीदार बाजार आवाराबाहेरच शेतीमाल खरेदी विक्री करत असल्याने बाजार समितीमध्ये आवक होत नसल्याचे वास्तव आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे सुमारे दोन महिने बंद असलेल्या पुणे बाजार समितीमधील फळे, भाजीपाल्याचा बाजार पूर्ण क्षमतेने सुरु केल्यानंतरही आवक तुरळकच आहे. शुक्रवारी (ता.५) भाजीपाल्याची २८४ वाहनांमधून अवघी सुमारे ६ हजार क्विंटल आवक झाली होती. शेतकरी आणि खरेदीदार बाजार आवाराबाहेरच शेतीमाल खरेदी विक्री करत असल्याने बाजार समितीमध्ये आवक होत नसल्याचे वास्तव आहे. 

‘कोरोना’ला घाबरून अडते आणि कामगार संघटनांनी प्रशासनावर दबाव आणत दोन महिने बाजार बंद ठेवला. परिणामी शेतकरी आणि खरेदीदारांनी बाजार आवारात लगत आणि उपनगरांमध्ये परस्पर खरेदी - विक्री सुरु केली. ही खरेदी-विक्री हमाली, तोलाई, अडतीशिवाय सुरु झाली. त्यामुळे दोन महिन्यांनी अडते आणि कामगार संघटनांच्या मागणीनंतर बाजार सुरु झाल्यावरही बाजारात आवक होत नसल्याचे चित्र सध्या आहे. बाजार सुरु करताना, गर्दी नियंत्रित करण्यासाठी चक्राकार पद्धतीने बाजार सुरु करण्यात आला.

मात्र दोन दिवसांत भाजीपाल्याची काहीच आवक होत नसल्याचे दिसल्यावर, अडते आणि हमाल संघटनांनी बाजार पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य केल्यानंतरही आवक होत नसल्याने अडते आणि हमाल हवालदिल झाले आहेत. त्यामुळे अडते आणि कामगारांनी बाजार आवाराबाहेरील, उपनगरांमधील शेतकरी ते खरेदीदार होणारा थेट व्यापार बंद करण्याची मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली. मात्र आयुक्तांनी बाजार समित्यांची गरजच राहिली नसल्याचे सुनावले आणि शहरातील भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री बंद करण्याबाबत त्यांनी कोणतीही भूमिका न घेतल्याचे समजते. 

नियमनमुक्तीचा प्रभाव  चार वर्षांपुर्वी बाजार समितीच्या नियंत्रणातून फळे, भाजीपाला मुक्त करण्यात आला. मात्र याची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून झाली नाही. मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरे आणि उपनगरांमध्ये शेतकरी ते खरेदीदार यांच्यात अडत, हमाली, तोलाई शिवाय शेतीमालाची खरेदी-विक्री सुरळीत झाली आहे. ‘कोरोना’मुळे नियमनमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे तुर्ततरी चित्र आहे.    अडत्यांवर भाजीपाला बास्केटच्या मागणीची वेळ  बाजार समित्यांमधील अडत्यांनी वर्षानुवर्षे शेतीमालाच्या दरांवर स्वतःचे वर्चस्व ठेवले.  मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बाजार बंद ठेवल्याने  काही अडत्यांना शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेली भाजीपाला बास्केटची मागणी नोंदवावी लागली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com