पालघरच्या विमानतळाने विकासाला गतीचा बूस्टर 

वसई : पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा, नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्यातच पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहे
वसई : पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा, नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्यातच पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहे
वसई : पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा, नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. त्यातच पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहे

वसई : पालघर जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा,आदिवासी बांधवांची परंपरा, कला यांसह हिरवागार परिसर हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. दळणवळणाच्या दृष्टीनेही हा जिल्हा महत्त्वाचा आहे. त्यातच पर्यावरण मंत्री यांनी पालघरमध्ये तिसरे विमानतळ होणार, अशी घोषणा करून जिल्ह्याचे महत्त्व वाढण्याची नांदीच दिली आहे. या विमानतळाच्या जागेबाबत गोपनीयता असली तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्यानंतर पालघरच्या विकासाला एकप्रकारे गतीचा बूस्टर मिळणार आहे. 

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. विकासापासून दूर असला तरी मुंबईला लागून हा जिल्हा असल्याने आता हळूहळू शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने हा जिल्हा वेग घेत आहे. जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभल्याने मुंबईप्रमाणेच राज्य आणि इतर राज्यांतील नागरिकही येथे पर्यटनासाठी येत असतात; परंतु जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राचा हवा तितका विकास अद्याप झालेला नाही. त्यामुळे विमानतळ झाल्यास येथील विकासाला चालना मिळणार आहे. 

तीन जागांना पसंती ?  दापचरी येथे सरकारची ६ हजार एकर इतकी जमीन आहे; तर सफाळे येथे ५०० एकर व वसई-नालासोपारा शहराच्या मध्यभागीदेखील जमीन उपलब्ध आहे. तिसरे विमानतळ जर उभारायचे असेल तर या तीन जागांना सरकारकडून पसंती दिली जाण्याची शक्यता आहे.   

विमानतळ झाल्यास पालघर जिल्ह्यातील व्यापारी वर्गाला फायदा होणार आहे. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे विकासाला नक्कीच चालना मिळू शकते. तसेच येथे परदेशी नागरिकांची ये-जाही वाढेल.  - राजेंद्र गावित, खासदार, पालघर.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com