अवकाळीची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली धास्ती

नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागांत बुधवारी (ता.१७) झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन ही पिके पावसात भिजली आहेत. तर काढणीस आलेला खरीप लाल कांदा व उन्हाळा कांदा रोपवाटिकांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे.
Fear of untimely grape growers
Fear of untimely grape growers

नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागांत बुधवारी (ता.१७) झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन ही पिके पावसात भिजली आहेत. तर काढणीस आलेला खरीप लाल कांदा व उन्हाळा कांदा रोपवाटिकांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर द्राक्ष छाटण्या झालेल्या ज्या बागा फुलोरा अवस्थेत आहेत तेथे गळकुजीची समस्या दिसून येत आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या पावसाची धास्ती घेतली आहे.

विविध भागांत दुपारनंतर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. इगतपुरी, पेठ व सुरगाणा परिसरातं भात सोंगण्या होऊन पेंढ्या खळ्यावर पडलेल्या होत्या. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे भिजल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची साळ झोडण्याच्या कामात अडचणी येणार आहेत. 

चांदवड, निफाड, देवळा तालुक्यांतील अनेक भागांत अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. द्राक्ष उत्पादक पट्ट्यात ज्या द्राक्ष बागा फुलोरा अवस्थेत आहेत. त्यांच्यामध्ये डाऊनी आणि कूज यांचा धोका वाढला आहे. फुलोरा अवस्था संवेदनशील असल्याने त्याचा धोका संभवत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर काही भागात गळकूज होण्याच्या समस्येने डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्चात वाढ होणार आहे. फुलोरा अवस्थेतील घडांमध्ये पाणी साचून कूज होत असल्याची दिसून येत आहे. कसमादे भागातील पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादक पट्ट्यात माल सध्या तयार आहेत. सलग दोन वर्षे मोठे नुकसान सोसल्याने येथील शेतकऱ्यांनी या पावसाचा धसका घेतला आहे.  जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. चांदवड तालुक्यात उत्तर दक्षिण भागात काढणीसाठी आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी खरीप कांदा काढणीस आलेला आहे तो भिजून नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. आगामी उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे रोपे टाकली होती. मात्र यापूर्वी ती अतिवृष्टीमुळे वाया गेली. तर पुन्हा टाकलेली रोपे तयार करण्याची लगबग सुरू असताना पुन्हा कांदा रोपवाटिका त्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आली आहे. येवला, सिन्नर, दिंडोरी तालुक्यांत तुरळक पाऊस झाला. कळवण तालुक्यात झालेल्या पावसामुळे कांदा रोपे बाधित होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर सटाणा, नांदगाव, मालेगाव तालुक्यात ढगाळ वातावरण होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com