सोलापूर ः महावितरणने शेतकऱ्यांच्या वीजेसंबंधी अडचणी सोडवण्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २४० गावात हा उपक्रम राबवण्यात आला. सध्या रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतीपंपाच्या वीज मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे हा उपक्रम चांगलाच फायदेशीर ठरला आहे.
महावितरणचा हा उपक्रम वीज समस्यांवर चांगला उपाय ठरल्याने महावितरणकडून संपूर्ण राज्यात तो राबविला जात आहे. ज्या गावात वीज थकबाकीची वसुली जास्त आहे, त्या गावाची निवड प्राधान्याने केली जात आहे. हा उपक्रम राबवित असताना पुरेशे मनुष्यबळ, साधनसामग्री सोबत घेऊन त्या त्या गावात पूर्ण लक्ष केंद्रित केले जात आहे. पूर्ण चौकशी करून त्या गावातील विजेच्या समस्या सोडल्या जात आहेत. सध्या रब्बी हंगाम सुरु आहे. साहजिकच, पाण्याची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीही तातडीने सुटत असल्याने शेतकऱ्यांना हा उपक्रम चांगलाच फायद्याचा ठरला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २४० गावात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. अशी होतायेत कामे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.