ओझर : अवकळी पावसाने घडकुज झाली आणि द्राक्षबाग फेल गेल्याने दीक्षी (ता. निफाड) येथील शेतकरी ज्ञानेश्वर तांबडे यांनी मुलाप्रमाणे जपलेल्या दीड एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविली. निफाड तालुका मिनी कॅलिफोर्निया समजला जातो. ऊस, कांदा या नगदी पिकांबरोबरच द्राक्षाचे मोठे उत्पादन घेतले जाते. दोन वर्षांपासून द्राक्ष कोरोना महामारीने पिकवता अन् विकताही आले नाहीत. त्यातच व्यापाऱ्यांनी कमी भावात द्राक्ष घेतली. काहींनी शेतकऱ्यांना गंडाही घातला. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला. कधी विजेचा लपंडाव, तर कधी बेमोसमी हवामानाचा फटका, फवारणीचा वाढलेला खर्चामुळे वाढत चाललेला कर्जाचा बोजा, अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून, बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कधीही भरून न निघणारे नुकसान दरवर्षी होच आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे दुहेरी संकटात बागा जपायच्या कशा, या चक्रव्यूहात सापडलेल्या दीक्षीचे शेतकरी ज्ञानेश्वर तांबडे यांनी दीड एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाडीचे घाव घालून उद्ध्वस्त केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.