खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद 

जळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील अनेक गावांमधील शिवारात ऐन रब्बी हंगामात कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिले चुकीकी, अवास्तव असल्याचे सांगून ही बिले भरणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
Power outages in many villages in Khandesh
Power outages in many villages in Khandesh

जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील अनेक गावांमधील शिवारात ऐन रब्बी हंगामात कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिले चुकीकी, अवास्तव असल्याचे सांगून ही बिले भरणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

जळगाव तालुक्यात किंवा जळगाव ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. वारंवार वीज कंपनीचे कर्मचारी विजबिलांसाठी वीजपुरवठा खंडित करीत आहेत. नुकताच फुपनगरी (ता.जळगाव) येथे एका झिरो वायरनमने बरडे शिवारात बाळू जगन जाधव यांच्या शेतानजीक रोहित्राचा वीजपुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सत्तेत येण्यापूर्वी वीजबिल माफी, २४ तास मोफत विजेची घोषणा केली जात होती आणि आता शेतकऱ्यांना वीजबिलांसाठी वेठीस धरले जात आहे. ऐन रब्बी हंगामात वीज बंद करून शेतकऱ्यांची कोंडी करणे लोकप्रतिनिधींना महागात पडेल, असा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ६०० गावांमध्ये कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद आहे. ज्यांनी बिले भरली, त्यांचीच वीज सुरू केली जात आहे. अशात काही तुपाशी तर काही उपाशी अशी स्थिती तयार झाली आहे. धुळ्यातही शिरपूर भागात वीज बंद करण्याची मोहीम सुरू आहे. नंदुरबारातही तळोदा, नवापूर भागात शेतकरी वीज बंद मोहिमेने त्रस्त झाले आहेत. किती दिवस सरकार शेतकऱ्यांची कोंडी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com