अलिबागः आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. रेशन कार्ड, आधार कार्डचे १०० टक्के वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या ११.५८ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कातकरी उत्थान अभियान यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.
भगवान बिरसा मुंडा जयंती, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व जनजाती गौरव सप्ताहांतर्गत आदिवासींसाठी जनजागृती कार्यशाळा जिल्हा नियोजन भवन सभागृहात झाली. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव,उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, उपवनसंरक्षक आशीष ठाकरे, सहायक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आदी उपस्थित होते.
‘‘आदिवासींना विविध सरकारी योजनांचे सर्वतोपरी लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच अन्य विविध शासकीय विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता सप्तसूत्री तयार करण्यात येत असून दर महिन्याला आदिवासी प्रकल्प विकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आदिवासींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक, आदिवासींचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची मोहीम तसेच विविध कर्ज मेळावे आदींसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत,’’ असेही कल्याणकर यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.