मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर 

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्याअखेर ८५ टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पात ९० टक्‍के, मध्यम प्रकल्पात ८९ टक्‍के, लघु प्रकल्पात ७० टक्‍के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात ७८ टक्‍के आहे.
 प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्याअखेर ८५ टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पात ९० टक्‍के, मध्यम प्रकल्पात ८९ टक्‍के, लघु प्रकल्पात ७० टक्‍के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात ७८ टक्‍के, तेरणा, मांजरा, तेरणा नदीवरील बंधाऱ्यात ८९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. 

गत पावसाळ्यात जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील मोठी, मध्यम व लघू प्रकल्प अपवाद वगळता तुडुंब झाली होती. जलसंपदा विभागाच्या १४ जानेवारीपर्यंतच्या अहवालानुसार सर्व मिळून ८७५ प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ सिनाकोळेगाव व निम्न तेरणा हे दोन प्रकल्प तुडुंब होते. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्‍वर प्रकल्पात सर्वांत कमी ५८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा होता. तर इतर मोठ्या प्रकल्पात ८९ ते ९८ टक्‍क्‍यांदरम्यान उपयुक्‍त पाणीसाठा होता. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पात ९३ टक्‍के, जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ८६ टक्‍के, बीड जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत ९१ टक्‍के, लातूर जिल्ह्यातील ८ प्रकल्पांत ८५ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ९३ टक्‍के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ८२ टक्‍,के तर परभणी जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पांत ८५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. ७४९ लघू प्रकल्पांपैकी औरंगाबादमधील ९६ प्रकल्पांत ७१ टक्‍के, जालन्यातील ५७, बीडमधील १२६ व लातूरमधील १३२ प्रकल्पांत ७८ टक्‍के, उस्मानाबादमधील २०६ प्रकल्पांत सर्वांत कमी ५९ टक्‍के, नांदेडमधील ८४ प्रकल्पांत ७५ टक्‍के, परभणीतील २२ प्रकल्पांत ७७ टक्‍के, तर हिंगोलीतील ६४ लघू प्रकल्पांत ६४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. मोठ्या प्रकल्पांपैकी १० प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, तर एका प्रकल्पात ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. मध्यम प्रकल्पांपैकी ७२ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, २ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍क्‍यांदरम्यान, तर एका प्रकल्पात २५ ते ५० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. ७४९ लघू प्रकल्पांपैकी औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी १ व उस्मानाबादमधील २ लघू प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आला आहे. २२ लघू प्रकल्पातील पाणीसाठा २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी ४९ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्यांदरम्यान, २७५ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्‍क्‍यांदरम्यान, तर ३९९ लघू प्रकल्पात ७५ टकक्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com