सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या तिव्रतेत वाढ

सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या तिव्रतेत वाढ
सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या तिव्रतेत वाढ

सांगली : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. सध्या आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, जत आणि तासगाव तालुक्यांतील ४१ गावांत आणि २२५ वाडी-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी २५ खासगी आणि ४ शासकीय टँकरचा वापर केला जात आहे. जिल्ह्यातील ९६ खासगी विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.

पाण्याअभावी जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची पुरेशी वाढ झाली नाही. अनेकांची पिके वाळून गेली. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने पीक पाहणी करून २४६ गावात ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्य सरकारने जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, जत आणि तासगाव तालुक्यातील सर्व गावांत आणि अन्य तालुक्यांतील दहा मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे मागेल त्या ठिकाणी पाहणी करून टँकर सुरू करण्यात येत आहेत. अधिग्रहित पाणी केवळ दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात येत आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि आरफळ या योजनांमुळे गावांत पाणी गेले आहे. पूर्वभागातील २२५ लहान- मोठ्या तलावांत पाणी भरले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी पाणीपातळीत वाढ झाली आहे.

साडेचार हजार एकरांवर चारा लागवड दुष्काळात जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातील साडेचार हजार एकरांवर चारा लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि पाणी मोफत देण्यात आले. त्याशिवाय पाणी नसलेल्या तलावाची जमीन चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च आला, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

तालुका गावे वाड्या टॅंकर संख्या
जत ६८  १०
कवठेमहांकाळ ३०  ५ 
तासगाव २  
खानापूर 3 -
आटपाडी १६ १२२  १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com