काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या साह्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आंबा काढल्यानंतर लगेच सावलीमध्ये ठेवावा. तसेच आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. काजू
काजू झाडांचे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी. काजूमध्ये रोठा या किडीच्या (खोडकिडीचा) प्रादुर्भावासाठी खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिडीचा प्रादुर्भाव झाडाचे खोड व उघडी मुळे यावर दिसून येतो. खोडकिडीची अळी झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुसा येताना दिसल्यास, नियंत्रणासाठी १५ एम. एम. पटाशीच्या साह्याने खोडाची प्रादुर्भावित साल काढून रोठ्याला बाहेर काढून मारून टाकावे. क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या द्रावणाने साल काढलेला भाग चांगला भिजवावा. हे करताना झाडाला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. इजा झाल्यास त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाही याची काळजी घ्यावी. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या रोपांना सावली करावी. नारळावरील इरीओफाईड कोळीच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसून येतात. प्रादुर्भावग्रस्त भागावरील फळांचे आवरण तडकते. परिणामी नारळ लहान राहतात. लहान फळांची गळ होते. व्यवस्थापनासाठी बागेत स्वच्छता ठेवावी. नारळाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे. तसेच ५ टक्के कडूनिंबयुक्त (अझाडिरॅक्टीन) कीटकनाशक ७.५ मिलि अधिक ७.५ मिलि पाण्यात मिसळून वर्षातून तीन वेळा (ऑक्टोबर ते नोव्हेंबर, जानेवारी ते फेब्रुवारी आणि एप्रिल ते मे) मुळांद्वारे द्यावे. पुढील ४५ दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत. नारळ बागेतील सुकलेल्या झावळ्या, पालापाचोळा, गवत काढून बागेत स्वच्छता ठेवावी. यामुळे गेंडा भुंगा किडीच्या नियंत्रणास मदत होते. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या साह्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आंबा काढल्यानंतर लगेच सावलीमध्ये ठेवावा. तसेच आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. फळे काढणीनंतर देठकुजव्या आणि फळकूज या काढणीपश्चात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळे काढणीनंतर लगेच ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. आणि नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. फळांची पॅकिंग कोरोगोटेड फायबर बॉक्समध्ये करावी. वाढीच्या अवस्थेत (वाटाणा ते सुपारी आकाराची फळे) असलेल्या आंबा झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे. मोठ्या आकाराच्या आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. बागेमधील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी दापोली विद्यापीठाने शिफारस केलेले “रक्षक फळमाशी सापळा” एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे लावावेत. साधारणतः जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील याची काळजी घ्यावी. आंबा कलमांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी. - ०२३५८- २८२३८७ - डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ - डॉ. शीतल यादव, ८३७९९०११६० (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)