गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनापर्यंतची माहिती घेतली. सिंचनाची सुविधा असलेल्या भागामध्ये बांबू लागवडीची योग्य निगा घेतल्यास चाळीस वर्षांपर्यंत उत्पन्न देण्याची या पिकाची क्षमता आहे. त्यातच स्वमालकीच्या लागवडीतून कापणी, वाहतुकीसाठीच्या जाचक अटी कमी झाल्या आहेत. बांबू लागवडीनंतर झाल्यावर प्रथम वर्षी रोपांना महिन्यातून एकदा नियमितपणे मातीची भर द्यावी. यामुळे कंद जोमाने वाढतात. मातीची भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. बांबू जमिनीतल्या मूळ खोडापासून वाढतात. मूळ खोडापासून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नवीन कोंब फुटतात. बांबू या वृक्षाची वर्षभर सर्व काळात वाढ होते, त्यामुळे जमिनीत योग्य ओलावा राहील यासाठी काळजी घ्यावी. ओलावा टिकून राहण्यासाठी रोपांच्या जवळ गवताचा, धसकटाचे आच्छादन करावे. हे सेंद्रिय पदार्थ कालांतराने कुजून त्यापासून अन्नद्रव्ये बांबूला मिळतात. मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून बांबूचे संरक्षण करावे.
तणव्यवस्थापन बांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असून, त्याची मुळे साधारणतः जमिनीच्या वरील थरात असतात. मातीच्या वरील थरातील अन्नद्रव्यांसाठी तणाशी स्पर्धा होते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी रोपांभोवतीचे तण काढावे. रोपांच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोडमुळाची वाढ जोमदार होते.
छाटणी प्रत्येक कळकाच्या पेऱ्यामध्ये फांद्या फुटत असतात. अशा फांद्यांचा नवीन येणाऱ्या कळकाच्या सरळ वाढीला अडथळा होऊन कळक वेडावाकडा वाढतो. हे टाळण्यासाठी अशा फांद्याची कळकाच्या अंगालगत जितक्या खालीपासून करता येईल, तितक्या खालपासून छाटणी करावी.
आंतरपिके लागवडीनंतर बांबू तीन ते चार वर्षांनी पक्व होण्यास सुरवात होते. सुरवातीच्या दोन ते तीन वर्षांत दोन ओळींतील पट्ट्यात मूग, उडीद, कुळीथ व सोयाबीनसारखी आंतरपिके घेणे शक्य आहे. आंतरपिकातून अतिरिक्त उत्पन्नासोबतच जमीन तणविरहित राहण्यास मदत होते.
मूळ खोडाची काळजी
उत्पादन व उत्पन्न
उपयोग
व्यावसायिकदृष्टीने बांबू लागवड
काढणी व उत्पन्न कंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते. बांबूची लागवड जर रोपांपासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू तोडावा. बांबू कापताना तो जमिनीलगत न तोडावा, दुसऱ्या व तिसऱ्या पेऱ्याच्या मध्यभागी (३० सें.मी. अंतरावर) धारदार कुऱ्हाडीने घाव घालून तोडावा. असे न केल्यास खोडमुळाच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूचे खोडमूळच मरते. बांबू कापणीबाबत नियम
संपर्क : डॉ. विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२०, (कृषी महाविद्यालय, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट, जि. नगर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.