बायोचार हा कोळशाचा एक प्रकार आहे. वनस्पतींची पाने, तण, लाकूड इत्यादी पदार्थ कमी हवेत ‘पायरोलिसिस’ या नियंत्रित ज्वलन पद्धतीद्वारे बायोचार तयार होतो. बायोचार सच्छिद्र असते. त्यामुळे कोणतेही द्रव स्वरूपातील खत यात जिरते. झाडाला ते दिल्यास त्याची हळूहळू उपलब्धता होते व झाडांची वाढ उत्तम होते. कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, जिवाणू खत बायोचारमध्ये जिरवून वापरल्यास जिवाणूंची संख्या वाढते. जमिनीत सेंद्रिय कर्ब २ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ती जमीन सुपीक समजली जाते. शास्त्रज्ञांना अमेझॉनच्या खोऱ्यात काही ठिकाणी टेरा प्रेटा ही अत्यंत सुपीक जमीन आढळली. तेथे १० टक्क्यांपेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब आढळून आला. ही जमीन शेकडो वर्षांपूर्वी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी तयार केली होती. त्याच्या आजूबाजूच्या जमिनी मात्र नापीक आहेत. या सुपीक जमिनीत प्रामुख्याने बायोचार (सुपीक कोळसा) तसेच मासे व प्राण्यांची हाडे, मातीच्या भांड्यांचे तुकडे, कंपोस्ट खत आढळून आले. यामुळे बायोचारकडे जगातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे.
बायोचार
पुणे येथील डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांच्या नेतृत्वाखाली बायोचार निर्मितीबाबत संशोधन सुरू आहे. त्यांनी बायोचार निर्मितीचे सोपे तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी एक भट्टी आणि स्टोव्ह विकसित करण्यात आली आहे.
बायोचार निर्मितीचे प्रयोग
(टीप ः प्रत्येक ठिकाणी एवढी वाढ मिळेलच असे नाही.) कंपोस्ट खत हे खत तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. पालापाचोळा, गवत खड्ड्यात भरून किंवा जमिनीवर ढीग करून कंपोस्ट करता येते. वेस्ट डीकंपोजर हे उत्तम खत राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्र, गाझियाबादने विकसित केले आहे. त्याची किंमत केवळ वीस रुपये आहे. पोस्टाद्वारे हे खत घरपोच येते. याच्या वापराने ४० दिवसांत काडीकचरा कुजून उत्तम खत तयार होते. निष्कर्ष पालापाचोळा, तण, काडीकचरा अनियंत्रित पद्धतीने न जाळता शास्त्रशुद्ध पद्धतीने कंपोस्ट व बायोचार करणे आवश्यक आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होईल. तसेच हवेतील कर्ब वायूच्या प्रदूषणाला आळा बसेल. कंपोस्ट, बायोचार करण्याच्या स्थानिक पद्धती टाळ घालणे ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होतो. या काळात तळकोकणात पालापाचोळा, गवत काढून आंब्याच्या झाडाभोवती गोलाकार चर मारून पुरण्यात येते. पुढच्या २-३ महिन्यांत त्याचे उत्तम खत तयार होते. यामुळे हापूस आंब्याचा दर्जा व उत्पादन वाढते. राब पद्धत पालापाचोळा, गवत झाडाच्या लहान फांद्या इत्यादींचे ३ थर करावेत. त्यावर माती पसरून आग लावावी. माती पसरल्याने काही प्रमाणात बायोचार तयार होतो. ढिगारा पद्धत लाकडे रचून त्यावर माती टाकली जाते. त्याला आग लावून कोळसा तयार केला जातो. यापद्धतीद्वारे देखील काही प्रमाणात बायोचार तयार होतो. परंतु या दोन्ही पद्धतींत धूर होतो. - प्रमोद जाधव, ९४२३३७५२९२ (उपआयुक्त, समाज कल्याण विभाग, जि. सिंधुदुर्ग)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.