शेतकरी नियोजन पीक : काजू

मी २०१३ मध्ये वेंगुर्ला-७ ची २५० आणि २०१५ मध्ये वेंगुर्ला-४ ची तीनशे झाडांची लागवड केली आहे. त्यातील तीन एकर वेंगुर्ला-४ ची तीनशे झाडे डोंगरभागात असून, त्यासाठी एक टाकी बसवून पाण्याची सोय केली आहे. त्यामध्ये टेम्पोने पाणी आणून वेळापत्रकानुसार (प्रत्येक महिन्याच्या १, १० आणि २० तारखेला) पाणी दिले जाते. तिसऱ्या वर्षांपासून काजू उत्पादन मिळू लागला आहे.
In the cashew garden, cleanliness is given special priority.
In the cashew garden, cleanliness is given special priority.

मी २०१३ मध्ये वेंगुर्ला-७ ची २५० आणि २०१५ मध्ये वेंगुर्ला-४ ची तीनशे झाडांची लागवड केली आहे. त्यातील तीन एकर वेंगुर्ला-४ ची तीनशे झाडे डोंगरभागात असून, त्यासाठी एक टाकी बसवून पाण्याची सोय केली आहे. त्यामध्ये टेम्पोने पाणी आणून वेळापत्रकानुसार (प्रत्येक महिन्याच्या १, १० आणि २० तारखेला) पाणी दिले जाते. तिसऱ्या वर्षांपासून काजू उत्पादन मिळू लागला आहे.  शेतकरी :  प्रकाश मनोहर पांचाळ.  गाव :  कोकिसरे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग  एकूण क्षेत्र :  ६.५ एकर.   काजू क्षेत्र :  ५.५ एकर (५५० झाडे) मी २०१३ मध्ये वेंगुर्ला-७ ची २५० आणि २०१५ मध्ये वेंगुर्ला-४ ची तीनशे झाडांची लागवड केली आहे. त्यातील तीन एकर वेंगुर्ला-४ ची तीनशे झाडे डोंगरभागात असून, त्यासाठी एक टाकी बसवून पाण्याची सोय केली आहे. त्यामध्ये टेम्पोने पाणी आणून वेळापत्रकानुसार (प्रत्येक महिन्याच्या १, १० आणि २० तारखेला) पाणी दिले जाते. तिसऱ्या वर्षांपासून काजू उत्पादन मिळू लागला आहे. यावर्षीचे नियोजन 

  • मे महिन्यात काजू बागेला शेणखत, रासायनिक खते देण्यात आले.  
  • जुनचा पाऊस पडल्यानंतर प्रति झाड २५ ते ३० किलो शेणखत दिले आहे. याशिवाय कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा देण्यात आली.
  • जून ते सप्टेंबर या कालावधीत बागेमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ग्रास कटरच्या साह्याने गवत काढणी करण्यात आली. त्याकरिता तीन ग्रास कटर खरेदी केले आहेत. संपूर्ण बाग १० ते १२ तणमुक्त करण्यात आली.
  • काजूला खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची अधिक शक्यता असते. सगळ्या झाडांच्या खोडांना बोर्डो मिश्रणाच्या गिलावा काढण्यात आला. 
  • ऑक्टोबर महिन्यात ढेकण्या रोगाचा प्रादुर्भाव आढळला. त्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कीटकनाशकांची फवारणी घेतली. त्यानंतर पालवी आल्यानंतर दुसरी, मोहोर आल्यानंतर तिसरी, तर फळधारणा सुरू झाल्यानंतर चौथी फवारणी करण्यात आली.  मोहोर आल्यानंतर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी घेण्यात आली.
  • ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस झाल्यास, गरजेनुसार फवारणी घेतो. या वर्षी साधारणपणे कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या सहा फवारण्या घेतल्या. 
  • हवामान बदलाचा काजूवर तत्काळ परिणाम होतो. त्यामुळे झाडांची पाने, मोहोर, फळे आदींवर लक्ष ठेवून काम केले जाते. 
  • सेंद्रिय प्रयोग  या वर्षीपासून वेंगुर्ला-७ च्या काजू बागेतून पूर्णतः सेंद्रिय उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. हा प्रयोग यशस्वी होत असून, काजू बीचा आकार मोठा झाल्याचे दिसून येत आहे. पुढील १५ दिवसांचे नियोजन 

  • सध्या काजूचे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू आहे. झाडावर परिपक्व होऊन जमिनीवर पडलेला काजू एकत्र केला जातो. काजू स्वच्छ पाण्याने धुऊन एक हलके ऊन दिले जाते. त्यानंतर तो पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविला जातो. ही प्रकिया किचकट असली, तरी काजू बी खराब होत नाही. सुकवून ठेवलेल्या मालाला व्यापाऱ्यांकडून दरही चांगला मिळतो. 
  • गेल्या वर्षी साधारणपणे सव्वातीन टन काजू उत्पादन मिळाले. या वर्षी साधारणपणे ४ टन उत्पादन अपेक्षित आहे. हे उत्पादन झाडांच्या वाढीप्रमाणे वाढत जाईल.  सध्या व्यापाऱ्यांकडून प्रति किलो १२० ते १२५ रुपये दर मिळत आहे. 
  • - प्रकाश पांचाळ, ९४२३२८६८६८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com