द्राक्ष बागेत सध्या वातावरणातील तापमानात सातत्याने घट होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आलेला दिसतो. या परिस्थितीत द्राक्ष बागेत आर्द्रतेचे प्रमाण वाढते. जमिनीमध्ये ओलावा वाढल्यामुळे वेलीची पाणी शोषून घेण्याची क्षमतासुद्धा तितकीच वाढते. अशा स्थितीमध्ये द्राक्ष बागेत येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ. फुटी जोमात वाढणे अचानक झालेल्या पावसामुळे मुळांच्या कक्षेत पाण्याचे प्रमाण वाढते. तसेच दोन ओळींच्या मध्यभागीही पाणी साचून राहते. या ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यामुळे कार्यक्षम पांढऱ्या मुळांची वाढ बोदाव्यतिरिक्त इतर भागांतही जास्त होते. पांढऱ्या मुळांचे क्षेत्र वाढल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांपैकी नत्राचा पुरवठा वेलीला अधिक होतो. जमिनीत असलेली मुळे संजीवकांची उत्पत्ती करून वेलीला पुरवठा करतात. अशा स्थितीमध्ये वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते. फुटींची वाढ जोमात होताना दिसून येते. फुटीच्या पेऱ्यातील वाढलेले अंतर हे वेलीतील शरीरशास्त्रीय हालचालींचा वाढलेला वेग दर्शवते. या प्रक्रियेत सायटोकायनिनचे प्रमाण कमी होणे, नत्र व पाण्याचा पुरवठा वाढणे यामुळे वेलीचा जोम जास्त वाढलेला दिसतो. काडीवरील बगलफुटींचीही वाढ होते. यासोबत पानांचा आकार व संख्या वाढते. पानांची गर्दी वाढून काडीवरील डोळ्यावर सूर्यप्रकाश पडत नाही. परिणामी, सूक्ष्मघड निर्मितीमध्ये अडचणी येतात. उपाययोजना
पानांच्या वाट्या होणे
उपाययोजना
घड बाहेर पडणे खरडछाटणीनंतर घडाचे चांगले पोषण होण्याकरिता साधारणपणे ८ ते १० मि.मी. जाडीची काडी व त्या काडीवर १६० ते १७० वर्ग सेंमी क्षेत्रफळांची १६ ते १७ पाने आवश्यक असतात. त्यानंतर आलेली पाने उपयोगाची नसून, शेंडा खुडणे गरजेचे होते. आपण बागेतील परिस्थिती पाहून (१३ ते १४ पानांच्या अवस्थेत) पाण्यावर नियंत्रण ठेवलेले असल्यास काडीची परिपक्वता तळापासून लवकर सुरू होईल. शेंड्याकडील वाढही थांबलेली असेल. वेळीच पाण्यावर नियंत्रण ठेवलेले नसल्यास शेंडा वाढ जास्त होते. काडीची परिपक्वता लांबणीवर जाते. काडी कच्ची राहिल्यामुळे फुटींची वाढ तितक्याच जास्त जोमात होईल. त्यानंतर आपण खुडा काढण्याची पद्धत अवलंबतो. खरेतर एक किंवा दोन पाने खुडल्यास वाढ लवकर थांबते. मात्र बऱ्याचदा आपण शेंड्याकडील आठ नऊ पाने खुडतो. याला हार्ड पिंचिंग असे म्हणतात. ही इतकी पाने खुडल्यामुळे निघालेल्या प्रत्येक नव्या फुटीवर दोन ते तीन घड आलेले दिसतात. या स्थितीत बागायतदार घाबरून जातात. आताच हे घड आले तर पुढील हंगामात घड येतील की नाही, ही शंका त्यांच्या मनात येते. खरेतर काडीच्या तळातून तीन ते चार डोळे सोडल्यास पुढील प्रत्येक डोळ्यामध्ये घड असतो. मात्र आपल्याला आवश्यक असा सशक्त आणि जोमदार असा घड ६ ते ८ डोळ्यांमध्ये (सबकेन), तर ६ ते ९ डोळ्यांमध्ये (सरळ काडी) दिसून येतात. १७ पानांनंतर खुडा काढला जातो. या खुड्यानंतर निघालेले घड हे तसेही आपल्या फायद्याचे नसतात. कारण आपल्याला आवश्यक असलेला घड मागील डोळ्यांमध्ये सुरक्षित आहेत. जास्त खुडा काढल्यामुळे आणि घड बाहेर निघाल्यामुळे त्या काडीतील अन्नद्रव्याचा ऱ्हास होतो. म्हणून घाबरून न जाता पुढील उपाययोजना कराव्यात. उपाययोजना
टायगर बड फुटण्याची समस्या नवीन बागेत (रिकट नंतर) ओलांडा तयार झाल्यानंतर फलधारीत काड्याची पूर्तता व्हावी, व त्या काडीमध्ये सूक्ष्म घडनिर्मितीही व्हावी, यासाठी बागायतदार बऱ्याच उपाययोजना करत असतात. यामध्ये सुरुवातीस नत्र व पाण्याची अधिक उपलब्धता केली जाते. त्यामुळे वेलीच्या वाढीचा जोम वाढतो. वेलीचा जोम वाढताना पेऱ्यातील अंतरही तितकेच वाढते. ही परिस्थिती सूक्ष्म घडनिर्मितीला हानिकारक असते. म्हणून सायटोकायनिनयुक्त संजीवकांची फवारणी (उदा. ६ बीए आणि युरासिल) केली जाते. त्यानंतर वाढ विरोधकांची सुद्धा एक ते दोन फवारणी करतात. इतकेच नाही तर शेंडा पिचिंग व बगलफुटी काढणे ही कामे केली जातात. यामुळे सायटोकायनिनचे प्रमाण वेलीमध्ये जास्त वाढते. या सर्व गोष्टींमुळे वेलीवर दाब निर्माण होतो. परिणामी, नाजूक असलेला भाग म्हणजे नुकताच तयार होत असलेला टायगर बड (मुख्य डोळा) जास्त फुटतो. उपाययोजना
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.