नाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील कृष्णदास रावजी जमधडे यांचे २४ हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे शेड आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कोंबडी खतावर प्रक्रिया करून ‘पॅलेट’ स्वरूपातील प्रक्रियायुक्त खत त्यांनी उपलब्ध केले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून त्यास चांगली मागणी असून, महिन्याला ८०० ते ९०० बॅग एवढी विक्री होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. नाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील कृष्णदास रावजी जमधडे यांनी २००६ मध्ये शेतीला पूरक म्हणून करार पद्धतीने ब्रॉयलर कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांनी चांगल्या प्रकारे स्थैर्य मिळवले. मध्यंतरीच्या काळात चेन्नई येथील पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या पोल्ट्री विभागाचे माजी प्रमुख डॉ. देवारेड्डी नरहरी यांचा लेख त्यांच्या वाचनात लेख आला. कोंबडी खत पॅलेट स्वरूपात बनविल्यास शेतात त्याचा वापर अधिक फायदेशीर ठरतो असे त्यात म्हटले होते. जमधडे यांना तो लेख अत्यंत महत्त्वाचा वाटला. त्यांनी उत्पादन व संधीच्या बाजू तपासल्या. अलीकडे विविध पिकांसाठी कोंबडी खताची मागणी वाढत आहे. शिवाय आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या कोंबडी विष्ठेवर प्रक्रिया केल्यास त्याला चांगला उठाव मिळेल ही बाब त्यांनी हेरली. त्यातून दाणेदार कोंबडी खत प्रक्रिया उद्योग उभारण्याची प्रेरणा मिळाली. कल्पकतेने उभारलेला प्रकल्प सुरुवातीला घरगुती पद्धतीने ग्राइंडरचा वापर करून खतनिर्मिती सुरू केली. मात्र त्यात अपेक्षित क्षमतेचे उत्पादन होत नव्हते. मग स्वतः संरचना तयार करून पुणे येथून प्रक्रिया यंत्र बनवून घेतले. त्यात पुढे सुधारणा करीत थ्री-फेज वीजजोडणीवर आधारित यंत्राची निर्मिती केली. स्वकल्पनेतून हे युनिट तयार करण्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च आला. संशोधकवृत्ती व उद्यमशिलतेतून ‘खुशाल ॲग्रोटेक’ नावाने दाणेदार कोंबडी खतनिर्मिती प्रकल्प स्वमालकीच्या जागेत उभा राहिला. नेटवर्क तीन वर्षांत सुमारे एक हजार ते बाराशेपर्यंत शेतकरी ग्राहकांचे नेटवर्क जोडले असून, त्यातून विक्री सुकर होते. नाशिकसह औरंगाबाद, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर खताचा पुरवठा केला जातो. प्रामुख्याने ऊस, कांदा, फळबागा यासाठी शेतकऱ्यांची मागणी अधिक असल्याचे जमधडे सांगतात. सोलापूर, सातारा या जिल्ह्यांतूनही मागणी आहे. मात्र उत्पादन क्षमता मर्यादित असल्याने तेवढा पुरवठा शक्य होत नाही. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी नवे युनिट कार्यान्वित करण्याचे प्रयत्न आहेत. कामाचे व्यवस्थापन
शेतकऱ्यांत जागृती कोंबडी खताचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते हे वाचनात आले. सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्याने रासायनिक खतांच्या वापरात बचत करणे शक्य होते असे प्रा. नरहरी यांचे म्हणणे होते. त्यानुसार वापराच्या बाजू जमधडे यांनी अभ्यासल्या. त्यादृष्टीने कोंबडी खताचे पिकांसाठीचे महत्त्व समजून सांगत कमी खर्चात वापर व्हावा हे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. विविध भागांतून शेतकरी संपर्क करून माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. प्रत्येकाला वेळ देऊन उत्पादन व वापरासंबंधी ते मार्गदर्शन करतात. पोल्ट्री क्षमता
खतनिर्मिती
संपर्क : कृष्णदास जमधडे ९४२११५५७४१ तुषार जमधडे ७८२०२०१६१७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.