काही भागात उघडीप, तर तुरळक ठिकाणी पाऊस

काही भागात उघडीप, तर तुरळक ठिकाणी पाऊस
काही भागात उघडीप, तर तुरळक ठिकाणी पाऊस

महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, तर मध्य महाराष्ट्रावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. उत्तर भारतात राजस्थानवर ९९६ हेप्टापास्कल, मध्य भारतावर ९९८ हेप्टापास्कल तर ओरिसाजवळ १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. २९ जुलै व ३० जुलै रोजी ही स्थिती कायम राहील. ३१ जुलै रोजी हवेच्या दाबात बदल होतील. उत्तर महाराष्ट्रात व विदर्भावर १००२ हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. १ ऑगस्ट रोजी तितकाच वाढीव हवेचा दाब महाराष्ट्रावर राहण्यामुळे महाराष्ट्राकडे येणारे नैर्ऋत्य वारे अल्पशा प्रमाणात बाष्प आणतील आणि ढगांचे प्रमाणही कमी होईल. पावसाचे प्रमाणही कमी होईल. बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होईल. मात्र ते फारसे अधिक नसल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी राहील. मराठवाड्यात पावसात उघडीप राहील. कोकणात अल्प ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात मध्यम ते अल्प स्वरुपाचा पाऊस होईल तर नाशिक जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्‍यता राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता आहे. उर्वरीत विदर्भात अल्प ते अत्यल्प पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली व नगर जिल्ह्यात पावसात उघडीप राहील. कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात अल्पस्वरूपात पावसाची शक्‍यता आहे. ३१ जुलै व  १ ऑगस्ट रोजी कोकणासह महाराष्ट्रात अल्पशा स्वरूपात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. मात्र त्यानंतर पुन्हा पावसात उघडीप राहील. त्यामुळे या आठवड्यात बहुतांशी भागात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात राहील.

कोकण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत १४ ते १८ मि.मी. प्रतिदिनी पावसाची शक्‍यता असून, या आठवड्यातील काही दिवशी पावसात उघडीप राहणेही शक्‍य आहे. रायगड व ठाणे जिल्ह्यांत प्रतिदिनी ८ ते १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, काही दिवशी पावसात उघडीपही राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १३ किलोमीटर राहील, तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किलोमीटर राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७९ ते ९० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील पश्‍चिम भागात अत्यअल्प ३ मिलीमीटर तर नंदूरबार जिल्ह्यात ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, धुळे व जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १९ किलोमीटर राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९८ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९६ टक्के राहील.

मराठवाडा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १७ किलोमीटर राहील. नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरीत जिल्ह्यांत ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ९१ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ पश्‍चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत अत्यअल्प पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किलोमीटर राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ते २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ९३ टक्के तर उर्वरीत सर्वच जिल्ह्यांत ९५ ते ९६ टक्के राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ८७ टक्के राहील. अकोला जिल्ह्यात ८४ टक्के तर बुलडाणा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ८७ टक्के राहील.

मध्य विदर्भ मध्य विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ३ ते ७ मिलीलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ किलोमीटर राहील. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यांत राहील. तसेच किमान तापमान २४ अंश सेल्सिअस सर्वच जिल्ह्यांत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९६ ते ९७ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८९ टक्के राहील. एकूणच हा आठवडा अत्यअल्प पावसाची शक्‍यता असल्याने बऱ्याचशा भागात पावसात उघडीप राहील.

पूर्व विदर्भ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १३ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत पहिल्या २ दिवसांत ६ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किलोमीटर राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरीत सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. तसेच आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९७ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता भंडारा जिल्ह्यात केवळ ७५ टक्के इतकी कमी राहील तर उर्वरीत जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ८८ टक्के इतकी कमी राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र सांगली व नगर जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता या आठवड्यात नाही. मात्र उर्वरीत कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील पश्‍चिम भागात केवळ ६ ते ७ मिलिमीटरक पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात प्रामुख्याने पावसात उघडीप राहील. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध होईल. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. या आठवड्यात वाऱ्याची ताशी वेग वाढेल आणि वाऱ्याचा वेग ताशी १७ ते २३ किलोमीटर राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर पुणे जिल्ह्यांत ते २८ अंश सेल्सिअस आणि सांगली जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. नगर व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील तर सांगली, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सोलापूर व नगर जिल्ह्यांत ७३ के ७४ टक्के राहील. मात्र उर्वरित सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८४ टक्के राहील. कृषी सल्ला

  • १५ ऑगस्टपर्यंत आडसाली उसाची लागवड करावी.  
  • पावसात उघडीप राहील, त्यामुळे आंतर मशागतीची कामे पूर्ण करावीत.
  • भात खाचरात ५ सें.मी. पर्यंत पाण्याची पातळी ठेवावी.
  • भात, ज्वारी, बाजरी, मका पिकांना नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
  • संपर्क : डॉ. रामचंद्र साबळे , (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com