सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन केंद्रांतर्गत फळ प्रकिया विभाग कार्यरत आहे. त्याद्वारे आंबा, काजू, फणस, तसेच अन्य स्थानिक मालापासून सरबत, कॅण्डी, जॅम, पावडर आदींची निर्मिती केली आहे. त्याविषयीचे संशोधन, तंत्रज्ञान व प्रशिक्षणही उपलब्ध करून शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योजक होण्याची दिशा दाखवली आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे फळसंशोधन केंद्र कार्यरत आहे. कोकणातील आंबा,काजू, कोकम, नारळ, सुपारी, आवळा यांसह विविध फळपिकांवर संशोधन, कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या कलम रोपांची निर्मिती, फळप्रक्रिया करून विविध उत्पादनांची निर्मिती व तंत्रज्ञान शेतकरी, उद्योजकांपर्यंत पोहोचविणे अशा विविध उद्देशांनी येथे कार्य चालते. काजूच्या वेंगुर्ला १ ते ९ या जातींच्या कलमांची निर्मिती या केंद्राने केली. त्यातील वेंगुर्ला ४ ते ७ या कलमांनी फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवली. कोकणातील हजारो हेक्टर क्षेत्र या जातींच्या लागवडीखाली आले आहे. कोकमाच्या अमृता आणि हातीस या विकसित जातीही लोकप्रिय आहेत. प्रक्रिया उद्योग
काजू बोंडावर प्रकिया काजू कलमांवरील संशोधनामुळे सिंधुदुर्गसहित रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यांतील आजरा, चंदगड या भागांत काजू लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढले. या पिकात बोंड रसाने भरलेला असतो. बियात गर असतो. शेतकरी बियाची विक्री करतात. मात्र मोठ्या प्रमाणात बोंड वाया जाते. त्यातील रस गुणकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यावर प्रकिया करण्याचा प्रयत्न केंद्रात सुरू होता. त्यात यश आले. बोंडापासून सरबत यापूर्वी बनविले जायचे. आता कॅण्डी, जॅम, पावडर, पोळी आदी उत्पादनांची निर्मितीही केंद्रात यशस्वी झाली आहे. पावडरीचा वापर विविध बिस्किटांमध्ये करता येणार आहे. काजू बोंडात ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. सध्या कोरोना संकटामुळे त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे त्यावर आधारित उत्पादनांना महत्त्व प्राप्त होण्यास मदत मिळेल. प्रशिक्षण
फळ संशोधन केंद्राची वैशिष्ट्ये
उत्पादने
पॅकिंग व किंमत बहुतांश उत्पादनांचे पॅकिंग ग्राहकांच्या मागणीनुसार १०० ग्रॅम, २०० ग्रॅम ते ५०० मिली या स्वरूपात ठेवले आहे. त्यांच्या किमती ५० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहेत. यंत्रसामग्री
केंद्रातच विक्री
दुर्लक्षित पिकांविषयी प्रयोग फळसंशोधन केंद्र आणि लुपिन फाउंडेशन यांच्यात गेल्या वर्षी दुर्लक्षित वनस्पतींची कलमे तयार करून व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करण्यासाठी सामंजस्य करार झाला. त्यातून सुरंगी, पपई, जांभूळ, वटसोल, वावडिंग आणि त्रिफळ या वनस्पतींची निवड करण्यात आली. पैकी सुरंगी, पपई आणि जांभूळ यांची कलमे तयार करण्यात केंद्राला यश मिळाले आहे. त्रिफळाची कलमे बांधण्यात काही अंशी यश आले असून, वावडिंगाची कलमे तयार करण्यावर भर दिला जात आहे. फळ संशोधन केंद्राने आंब्याच्या सात, काजूच्या नऊ तर फणस, जांभूळ, कोकम, लिंबू, केळी व जायफळ यांची प्रत्येक एक अशा २३ जाती विकसित केल्या आहेत. त्यामुळे केंद्राला जागतिक पातळीवर नावलौकीक मिळाला आहे. - डॉ. बी. एन. सावंत, सहयोगी संशोधन संचालक, फळसंशोधन केंद्र संपर्क : डॉ. मंगल कदम, ८२७५४७३०९६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.