भाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या प्रमाणात घट होते. त्यासाठी वेळीच त्याबाबत उपाययोजना कराव्यात. आवश्यकतेनुसार खुरपणी किंवा इतर मशागतीय पद्धतींचा अवलंब करावा. आवश्यकता भासल्यास तणनाशकांचाही वापर करावा. भाजीपाला पिकात एक किंवा दोन खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. दोन ओळीमध्ये अधिक अंतर असणाऱ्या पिकांमध्ये कोळपणीसुद्धा करता येते. मात्र, अलीकडे वाढती मजुरी आणि मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या होत आहे. कांदा पिकामध्ये लागवड कमी अंतरावर होते. त्यामुळे खुरपणीचा खर्च जादा येतो. उशिरा खुरपणी केल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच रोग किडींना पोषक वातावरण तयार होते. अशा स्थितीमध्ये तणनाशकांचा वापर करणे अपरिहार्य होते. मात्र, तणनाशकांचा वारंवार वापर करणे टाळावे. त्याऐवजी पिकांची फेरपालट, हिरवळीची पिके (उदा. ताग, धैंचा) आणि कमी कालवधीत जलद वाढणाऱ्या पिकांची लागवड (चवळी) करून तणांचा काही प्रमाणात बंदोबस्त करता येतो. भाजीपाला पिकामध्ये तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी...
कांदा, मिरची पिकांसाठी तणनाशकांचा वापर
संपर्क : डॉ. मधुकर भालेकर, ०२४२६-२४३३४२ (अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.