विकसनशील देशांमध्ये कृषी उत्पादकता आणि उत्पन्नाची पातळीवर वाढविण्यासाठी सहकार्य करारावरील पिकांचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत वाढविणे गरजेचे असल्याचे मत बोक्कोनी विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. युगांडा येथील झालेल्या प्रात्यक्षिक चाचण्यांमध्ये या पद्धतीने केलेल्या लागवडीमध्ये उत्पादनाचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत वाढले. सोबतच यातील सहभागी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये १४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. सध्या ग्राहकांसाठी उत्पादित केलेल्या शेतीमालाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आहे. ते कमी होणे आवश्यक आहे. मोठे जमीनदार आणि त्यांच्याकडे करारावर पिकांची लागवड करणाऱ्या लोकांच्या सहकार्यातून कृषी उत्पादन वाढीला चालना मिळू शकते. विशेषतः प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन म्हणून योग्य तो वाढीव मोबदला मिळाल्यास उत्पादकतेमध्ये वाढ होते. युगांडा येथील बोक्कोनी विद्यापीठातील सेलिम गुलेस्की आणि सहकाऱ्यांनी या संबंधाचा उत्पादकतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. बहुतांश विकसनशील देशांप्रमाणेच या विभागामध्ये जमीनदार आणि कष्टकरी, कसणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अर्धे अर्धे उत्पादन घेण्याचा सामान्य नियम आहे. या पद्धतीला अनेकवेळा कमी उत्पादकतेसाठी दोषही दिला जातो. युगांडामध्ये शेतकरी आणि जमीनदार यांच्या सहकार्यांतून शेती करण्याची कल्पना स्वयंसेवी संस्था बीआरएसी राबवत आहे. त्यांच्या सहकार्याने गुलेस्की आणि सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिक व चाचण्या घेतल्या. त्यातून १८९० मध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला विचार योग्य असल्याचे पुढे आहे. शेतीमध्ये कसणाऱ्या माणसाला प्रत्येक भांडवल आणि मजुराच्या बदल्यामध्ये त्याचा जमीनदाराला अर्धा हिस्सा द्यावा लागणार असला तर प्रत्येक निविष्ठा वापरण्यातील त्याचा उत्साह कमी होत जाईल. या कमी उत्साहामुळे एकूण उत्पादनामध्ये त्याला दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या तुलनेमध्ये दुपटीने घट होत जाते. - अल्फ्रेड मार्शल, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स (१८९०) या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक. प्रात्यक्षिकामध्ये ५०-५० टक्के विभागणीचे करार हे खरोखरच पुरेसे नसल्याचे समोर आले आहे. कष्ट करणाऱ्यांच्या वाट्यामध्ये ७५ टक्क्यांपर्यंत वाढ केल्यानंतर उत्पादन ६० टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रयोगासाठी स्वयंसेवी संस्थेने गुंतवणूक करत मोठी जोखीम उचलल्याबद्दल संशोधकांनी त्यांचे आभार मानले. असे झाले प्रयोग ः
निष्कर्ष ः प्रो. गुलेस्की म्हणाले, की आमच्या प्रयोगातून शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याचा योग्य पर्याय म्हणजे कष्टकऱ्यांना योग्य वाटा देणे हाच असल्याचे दिसून आले. यातून विकसनशील देशातील कष्टकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. दुसऱ्या बाजूला जमीनदाराच्या उत्पन्नामध्ये २० टक्क्यांपर्यंत घट होत असली तरी धोरणे आखून त्यातील काही भाग त्यांना परत देता येईल. यासाठी विशिष्ठ अशा धोरणांची आखणी करण्याची आवश्यकता आहे. हे संशोधन ‘दी क्वार्टर्ली जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.