भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र वातावरणामध्ये ज्वारी, बाजरी आणि मका यांसारख्या अन्नधान्य पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी स्थिर राहील. दरवर्षी त्यांच्या उत्पादनामध्ये अत्यल्प बदल होऊ शकतात. त्यातही दुष्काळाच्या वर्षामध्ये घट होऊ शकते. मात्र, भारताच्या मुख्य भात पिकाच्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता कोलंबिया येथील विदाशास्त्र संस्थेतील संशोधकांनी व्यक्त केली आहे. कायले फ्रॅंकेल डेव्हिस हे पर्यावरण विदाशास्त्रज्ञ (एन्व्हायर्न्मेंटल डेटा सायंटिस्ट) असून, विकसनशील देशांमधील अन्नधान्य पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधन करत आहेत. त्यासाठी त्यांनी पर्यावरणशास्त्र आणि विदाशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून जागतिक अन्न व्यवस्थेच्या पॅटर्नचा अभ्यास केला आहे. त्यातून अन्नपुरवठा साखळी अधिक पोषक आणि शाश्वत बनविण्यासाठी धोरण विकसित करण्याचा प्रयत्न आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये विदाशास्त्र संस्थेमध्ये आल्यापासून त्यांचे सहलेखक म्हणून चार संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यामध्ये विकसित होणाऱ्या राष्ट्रांमधील पिकांचे उत्पादन शाश्वतरीत्या सुधारण्यासंदर्भात विचार मांडले आहेत. नुकत्याच ‘एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च लेटर्स’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सेन्सिटिव्हिटी ऑफ ग्रेन यील्ड टू हिस्टोरिकल क्लायमेट सेन्सिटिव्हिटी ऑफ इंडिया’ या संशोधनामध्ये त्यांनी भारत देशावर लक्ष केंद्रित केले आहे. १.३ अब्ज लोकसंख्येच्या देशामध्ये वातावरण बदलांमुळे नाचणी, मका, बाजरी, ज्वारी आणि भात या पाच मुख्य पिकांच्या उत्पादनावर होणारे परिणाम अभ्यासले आहेत.
संशोधन
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.