वार्धक्याच्या समस्यांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे ही मुख्य समस्या असते. या समस्येला दूर ठेवण्यासाठी आहारामध्ये पालेभाज्या, संत्रे, लाल रंगाच्या भाज्या आणि बेरी फळे यांचा समावेश करणे फायद्याचे ठरत असल्याचे दिसून आले आहे. वाढत्या वयामध्ये संत्र्याचा रसही हा धोका कमी करतो. हे संशोधन ‘अमेरिकन अॅकेडमी ऑफ न्यूरॉलॉजी’ या संस्थेच्या ‘न्यूरॉलॉजी’ या वैद्यकीय संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. माणसाच्या स्मरणशक्तीवर परिणाम करणाऱ्या आहार घटकांचा दीर्घकालीन अभ्यास बोस्टन येथील हार्वर्ड टी. एच. चॅन सार्वजनिक आरोग्य विद्यालयातील संशोधक चॅंगझेंग युआन व सहकाऱ्यांनी केला आहे. सरासरी वय ५१ वर्षे असणाऱ्या २७,८४२ माणसांच्या अशा मोठ्या गटाचा २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून अभ्यास आणि पाठपुरावा करण्यात आला. या लोकांकडून प्रति दिन आहारात घेतल्या जाणाऱ्या फळे, भाज्या आणि अन्य खाद्यांविषयी प्रश्नावली भरून घेण्यात आली. दर चार वर्षांनंतर प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात एक फळ किंवा अर्धा कप रस, भाज्यामध्ये एक कप कच्च्या भाज्या किंवा दोन कप पानांचा रस असे मापनाचे निकष ठेवले.
निष्कर्ष ः सहभागी लोकांचे त्यांच्या फळे आणि भाज्या खाण्याच्या सवयीनुसार पाच गट केले होते. त्यातील निष्कर्ष असे होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.