पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत महत्त्वाची

पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत महत्त्वाची
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत महत्त्वाची

हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा संपूर्ण नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. हा धोका काही प्रमाणात तरी कमी करण्यासाठी पीकविमा उतरविण्यासाठी प्रयत्न केले जातात. विकसनशील देशामध्ये आपल्या पिकांचा विमा उतरविण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून, त्यामध्ये वाढ करण्यासाठी झुरीच विद्यापीठातील संशोधकांनी एक कार्यक्षम उपाय सुचवला आहे. चाचणीमध्ये विमा घेण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढविणे शक्य झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अनेक विकसनशील देशांची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत असून, शेतकरी कुटुंबे उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असतात. कोणत्याही कारणाने पीक खराब झाल्यास त्यांच्या कुटुंबांवर विपरीत परिणाम होतात. असे धोके कमी करण्यासाठी पीकविमा फायदेशीर ठरू शकतो. गेल्या दशकामध्ये कंपन्या, संस्था आणि शासकीय पातळीवर पीकविम्यासाठी प्रयत्न करूनही शेतकरी त्याकडे वळत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसते. झुरीच विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील लोरेन्झो कासाबुरी आणि जॅक विलिस यांनी यावर सोपा उपाय सुचवला आहे. जेव्हा पीकविम्याचा प्रश्न येतो, त्या वेळी त्याची वेळ विशेषतः अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये कॉल टाईम प्रेफरन्सेस अत्यंत महत्त्वाचे असतात. प्रमाणित विमा उत्पादनामध्ये त्याचा हप्ता (प्रिमियम) हा शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना म्हणजेच लागवडीच्या काळात ज्या वेळी त्याला अधिक पैशाची गरज असताना येतो. त्यामुळे भविष्यात अज्ञात फायद्यासाठी तो त्या वेळी खर्च करण्यासाठी तयार होत नाही. त्याचे मूल्य त्या वेळी कमी असते. सामान्यतः पिकाचा विमा हा हंगामाच्या सुरवातीला येतो. त्या वेळी शेतकऱ्यांची कामाची धांदल सुरू असताना बिया, यंत्रे अशा अनेक कृषी निविष्ठांसाठी त्याला पैशाची गरज असते. त्याच प्रमाणे असलेल्या पैशामध्ये त्याला हंगाम संपेपर्यंत कुटुंबाचे पोषणही करायचे असते. हे लक्षात घेऊन संशोधकांनी पुढील हंगामाचा विमा हप्ता भरण्याची वेळ काढणीच्या काळात आणली. शेतकऱ्यांना काढणीनंतर आलेल्या चांगल्या उत्पन्नातून हप्ता भरण्यात अडचण येत नाही. आणि एखाद्या वर्षी उत्पादन कमी मिळाले, तरी विम्याच्या आलेल्या रकमेतून त्याला हप्ता भरणे शक्य होते. या पद्धतीच्या त्यांनी केनियामध्ये नियंत्रित चाचण्या घेतल्या. त्याविषयी माहिती देताना लोरेन्झो कासाबुरी म्हणाले की केवळ विमा हप्त्याची तारीख बदलून आम्हाला विमा घेण्याचे प्रमाण ५ ते ७२ टक्क्यांपर्यंत वाढविणे शक्य झाले. त्यातही गरीब शेतकऱ्यांनी विम्याची मागणी अधिक प्रमाणात केली, हे महत्त्वाचे आहे. रोख रकमेची समस्या आणि सद्यःस्थिती ः आलेल्या निष्कर्षाची संशोधकांनी अन्य वेळी हप्ता असलेल्या योजनांशी तुलना केली. उदा. एका योजनेमध्ये हंगामाच्या सुरवातीला गटाने विमा हप्ता भरल्यास ३० टक्क्यांपर्यंत सवलत दिली होती. अशा प्रकारच्या सवलती असूनही शेतकऱ्यांमध्ये हंगामाच्या सुरवातीला विमा घेण्याचे प्रमाण कमी होते. यावरून शेतकऱ्यासाठी भविष्यातील फायद्यापेक्षाही सध्याची पेरणीची निकड भागवणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. या काळात तो विम्यासारख्या अन्य घटकांकडे फारसे लक्ष देत नसल्याचे स्पष्ट झाले. केनियामध्ये झालेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष अनेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. शाश्वत भरपाईकडे लक्ष दिल्यास फायदा ः वरवर पाहता संशोधनातून पुढे आलेल्या बाबी सोप्या वाटत असल्या तरी त्याचे परिणाम मोठे आहेत. लोरेन्झो म्हणाले की, पीकविमा हा एक प्रकारे करार असतो. यातील एका पक्षाची आर्थिक स्थिती व अर्थविषयक प्राधान्य याचा विचार आजवर केला गेला नव्हता. त्याच प्रकारे आधी पिकामध्ये नुकसान झाल्यास त्यातून मिळणाऱ्या विम्याच्या रकमेची पूर्तता योग्य प्रकारे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण यातून पुढील हंगामासाठीचा विमा हप्ता म्हणजेच विमा कंपनीचे चलन सुरू होणार आहे. विम्याची भरपाई योग्य प्रकारे मिळत नसल्यास शेतकऱ्याला अन्य कंपनीकडे वळणेही शक्य होईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com