सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे तलाव, नद्या यांचे प्रदूषण ही मोठी समस्या बनत आहे. अशा वेळी मुख्य पिकापैकी एक असलेल्या भातपिकाचा पाण्याच्या प्रवाहाचे शुद्धीकरण करण्यासाठीही चांगला उपयोग होऊ शकत असल्याचे संशोधनामध्ये आढळले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल एन्व्हायर्न्मेंट क्वालिटीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. भात हे जागतिक पातळीवरील सुमारे २० टक्के लोकांचे मुख्य खाद्य पीक आहे. जगभरामध्ये केवळ अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडामध्ये भाताची लागवड केली जाते. या भात लागवडीमुळे पाण्याच्या प्रदूषणाची समस्या दूर करणे शक्य होत असल्याचे अमेरिकेतील पर्यावरणशास्त्रज्ञ मॅट मूर यांच्या लक्षात आले. ते ऑक्सफोर्ड (मिसीसिपी) येथील अमेरिकी कृषी संशोधन सेवेच्या जल पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र संशोधन केंद्रामध्ये कार्य करतात.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.