कृषी सल्ला : ऊस, कांदा, मिरची, लसूण, आंबा, डाळिंब, रब्बी पिके

कृषी सल्ला (राहुरी विभाग)
कृषी सल्ला (राहुरी विभाग)

ऊस (पूर्व हंगामी ) पूर्व हंगामी उसाला १२ ते १६ आठवडे झाले असल्यास ३४ किलो नत्र (७४ किलो युरिया) प्रति हेक्टरी द्यावे. हरभरा अवस्था - काढणी बागायती हरभऱ्यांची विविध वाणांच्या पक्वतेनुसार काढणी व मळणी करावी. गहु अवस्था - दाणे भरणे पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी दाणे भरण्याच्या अवस्थेत चौथे पाणी द्यावे. या अवस्थेत उंदरांचा त्रास वाढतो. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विषारी आमिष तयार करावे. कोणत्याही धान्याचा जाडा भरडा ५० भाग घेऊ, त्यात एक भाग झिंक फॉस्फाईड मिसळावे. यामध्ये थोडेसे गोडेतेल टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करावे. प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या सहाय्याने खोलवर टाकावे. बिळे पालापाचोळा किंवा गवत टाकून झाकून घ्यावीत. बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत. रब्बी ज्वारी अवस्था - मळणी पहिल्या पंधरवड्यात कणसे उन्हात वाळवून झाल्यानंतर मळणी/ उफणणी करावी. साठवणुकीपूर्वी ज्वारीचे धान्य उन्हात वाळवावे. त्यानंतर त्याची साठवणूक करावी. कांदा अवस्था - काढणी रांगडा हंगामातील कांदा काढणीस तयार झाला असेल, तर तीन आठवडे आधी कांद्याचे पाणी बंद करावे. रब्बी हंगामातील कांदा पीक दोन महिन्यांचे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा. पीक स्वच्छ ठेवावे. उन्हाळी मिरची अवस्था - लागवडीची तयारी उन्हाळी मिरची लागवड करण्याकरिता जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रोपांची पुनर्लागवड करणे आवश्यक असते. लागवडीचे अंतर ६० बाय ४५ सें. मी. ठेवावे. हेक्टरी एक किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. फुले ज्योती व फुले मुक्ता या जातींचा वापर करावा. मिरचीला खत व्यवस्थापन करताना २० टन शेनखत, १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. त्यापैकी लागवडीपूर्वी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाशची मात्रा द्यावी. लागवडीनंतर एक महिन्याने उर्वरित ५० टक्के नत्राची मात्रा द्यावी. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने व गरजेनुसार पिकाला पाणी द्यावे. लसूण अवस्था - वाढ फुलकिडे व करपा नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी कार्बोसल्फान १ मिली किंवा प्रोफेनोफॉस १ मिली किंवा फिप्रोनील १.५ मिली यापैकी एका किटकनाशकांसोबत मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली या पैकी एक बुरशीनाशक मिसळावे. त्यात स्टिकर १ मिली प्रति लिटर पाणी मिसळल्यास फवारणीची कार्यक्षमता वाढते. वाल, वाटाणा, कोबी, फुलकोबी व बटाटा महाराष्ट्रामध्ये सध्या विषम हवामान चालू आहे. दिवसा उष्ण व रात्री थंडी असे वातावरण असल्यामुळे वाल, वाटाणा, कोबी, फुलकोबी व बटाटा या भाजीपाला पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी. डायमेथोएट (३० ईसी) १.५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड ०.५ मिली. आंबा अवस्था - वाढ तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मिली किंवा प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मिली. डाळिंब अवस्था - फळे लागणे फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा निंबोळीयुक्त किटकनाशक (अॅझाडिरेक्टीन) २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ०२४२६ -२४३२३९ (कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com