हिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध फळबागेसाठी समस्या ठरू शकते. थंडीची तीव्रता कमी करण्यासाठी फळबागेमध्ये योग्य त्या तापमान नियंत्रणाच्या उपाययोजना वेळीच कराव्यात. त्यातून कमी खर्चातून फळबागेचे आयुष्यकाळ वाढवण्यास मदत होईल. राज्यामध्ये हिवाळ्यातील तापमान हे अनेकवेळा १६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. अशा कमी तापमानाचा फळझाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. विविध फळपिकांची कमाल व किमान आणि सरासरी तापमान यांची मर्यादा वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या विभागातील तापमानाचा विचार करूनच फळपिकांची निवड केली पाहिजे. त्यातून फळबागांची उत्तम वाढ व दर्जेदार उत्पादनाची शाश्वती मिळत असली तरी ऋतूनुसार हवामानामध्ये होणारे कमी अधिक बदल पिकांसाठी त्रासदायक ठरू शकतात. हे बदल मुख्यतः तापमान आणि आर्द्रतेच्या बदलांमुळे होत असतात. सामान्यपणे ज्या वेळी तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते, तेव्हा उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील फळझाडांची कार्यशक्ती कमी होते. त्यापेक्षाही तापमान कमी झाले तर झाडांच्या पानांना इजा होऊन ती करपतात. फळांना भेगा पडतात. फळे काळी पडतात. मुख्यतः केळी, द्राक्षे व पपई या पिकांचे कडाक्याच्या थंडीमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. जर तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास खालील उपाययोजना कराव्यात. पूर्वदक्षतेचे उपाय
नियंत्रणाचे उपाय
डॉ. शशांक भराड, 09657725711 0724-2258168 (फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.